Flour-Mill
Flour-Mill 
मराठवाडा

आता दळणही होणार महाग

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - सध्या मराठवाड्यात दुष्काळी स्थिती आहे. प्रत्येक वस्तूचे भाव वाढत आहेत. अशातच घर खर्चात आणखी वाढ होणार आहे. कारण सात जानेवारीपासून दळणाचे भाव प्रतिकिलो पाच रुपये करण्याचा निर्णय मराठवाडा पीठ गिरणीमालक संघाने घेतला आहे.

पूर्वी अन्नधान्य स्वस्त किंवा घरचं असायचं आणि ते जात्यावर दळलं जायचं. त्याला फक्त मेहनत लागत होती. आधुनिक काळात यात खूप बदल होऊन विजेवरील पीठ गिरणी आल्या. दहा पैसे पायली (पाच किलो) या दराने धान्य दळून दिलं जाई. जसजशी महागाई वाढत गेली तसतसे धान्याचे भाव वाढत गेले. परिणामी पिठाच्या गिरणीवर दळणाचीही भाववाढ होत गेली. सध्या धान्याचे भाव गगनाला भिडत असताना सामान्य जनतेला त्याची दुष्काळामुळे झळ बसत आहे; परंतु परिस्थिती अशी निर्माण झाली आहे, की कष्ट करून आणलेलं धान्य गिरणीतून आणण्यासाठीही जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. 

सध्या रेशन दुकानात तीन ते चार रुपये प्रतिकिलो धान्य मिळते आणि ते दळण्यासाठी आता महिलांना प्रतिकिलो पाच रुपये द्यावे लागणार आहेत. म्हणजेच नाकापेक्षा मोती जड झाला आहे. गरिबांनी जगायचे कसे, हा प्रश्‍न निर्माण झाला आहे, अशी प्रतिक्रिया शीलाबाई दाभाडे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान; 'एवढा' मुद्देमाल लंपास

Thoda Tuza Thoda Maza : शिवानीसोबत 'या' अभिनेत्याचाही स्टार प्रवाहवर कमबॅक

DK Shivkumar: डीके शिवकुमार, 100 कोटी अन् भाजप नेता; प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ प्रकरणातील नवी घडामोड आली समोर

Latest Marathi News Live Update : मनमोहन सिंग, हमीद अन्सारी यांनी घरातूनच केलं मतदान

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT