Labourers Migration, Latur.jpg
Labourers Migration, Latur.jpg 
मराठवाडा

कामगारांचा पंधराशे किलोमीटर पायी प्रवास, भाकरीचा प्रश्‍न न सुटल्याने चालले गावी

हरी तुगावकर

लातूर  ः कोरोना विषाणुचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात टाळेबंदी झाली आहे. त्याची मोठी झळ हातावरचे पोट असणाऱ्या कामगार, मजूरांना बसली आहे. वाहतूक व्यवस्था ठप्प झाल्याने पोटासाठी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात कामासाठी गेलेल्या कामगारांची मोठी अडचण झाली आहे. त्यामुळे कुटुंबाची व गावाकडे जाण्याची ओढ लागलेले कामगार, मजुरांनी आता पायी जाण्याचा मार्ग अवलंबला आहे. बुधवारी (ता.एक) दुपारी येथील शिवाजी चौकात पंधराशे किलोमीटर पायी प्रवास करणाऱ्या आठ कामगारांची भेट झाली. एकीकडे कोरोनाची भिती तर दुसरीकडे गावाकडे जाण्याची ओढ अशा मनस्थितीत हे कामगार दिसून आले.


कोरोनाचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी देशभरात ता.२५ मार्चपासून टाळेबंदी करण्यात आली आहे. त्याचा मोठा फटका कामगार वर्गाला बसला आहे. कंपन्या बंद झाल्या आहेत. लहान-मोठे उद्योगांना कुलूप लागले आहेत. हॉटेल सारखे व्यवसायही बंद झाले आहेत. टाळेबंदीच्या काळात फक्त अत्यावश्यक सेवाच सुरु आहेत. हातावर पोट असणारे हजारो कामगार, मजूर एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाऊन काम करीत आहेत. टाळेबंदीमुळे हजारो किलोमीटर दूरहून आलेले हे कामगार आता बेरोजगार झाले आहेत. ज्या ठिकाणी कामाला होते तेथे आता व्यवस्था होत नाही. खाण्याची, राहण्याची अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे हे कामगार आता गावाकडे निघाले आहेत. त्यात टाळेबंदीमुळे वाहतूक व्यवस्था बंद आहे. एकही वाहन मिळत नाही.

त्यामुळे हे कामगार हजारो किलोमीटर दूर पायी प्रवास करण्यासाठी निघाले आहेत. असे काही कामगारांची बुधवारी दुपारी येथील शिवाजी चौकात भेट झाली. भोला कुशवाल, पापू कुशवाल, लाकन कुशवाल, किसनसिंग, रमाकांत , वेदप्रकाश, नयना, आकाश असे आठ कामगार धौलपूर (राजस्थान) येथील रहिवासी आहेत. गेल्या काही महिन्यांपासून ते हैदराबाद येथे एका कंपनीत कामाला होते. ती कंपनी बंद पडली. तेथे राहण्याची, खाण्याची सोय झाली नाही म्हणून ते आता हैदराबाद ते राजस्थान असा पंधराशे किलोमीटर पायी प्रवास करीत निघाले आहेत. तीनशे किलोमीटर अंतर पायी चालून बुधवारी दुपारी ते येथील शिवाजी चौकात आले. त्यांची भेट घेतली असता त्यांनी सर्व माहिती दिली. येथून बाराशे किलोमीटर असलेल्या गावाकडे जाण्याचा पायी प्रवास त्यांनी पुन्हा सुरु केला.


कंपनी बंद पडल्याने हैदराबादहून आम्ही आता राजस्थानला जात आहोत. कुटुंब गावाकडेच आहेत. त्यांना आमची चिंता आहे. वाहन मिळत नसल्याने पायी जात आहोत. वाटेत मदत करणारे भेटत आहेत. खायला देत आहेत. ते खावून पुढचा प्रवास सुरु आहे.
- भोला कुशवाल, धौलपूर, राजस्थान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

RCB Playoffs Scenario : चाहत्यांनो नाराज होऊ नका! RCB प्लेऑफमध्ये पोहोचणार, मुंबईनंतर गुजरातचाही खेळ जवळपास खल्लास

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

SCROLL FOR NEXT