उस्मानाबाद : जिल्ह्यातील प्रमुख आस्थापनांची वेळ सकाळी 9 ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. याशिवाय प्रत्येक शनिवारचा जनता संचारबंदीआता रविवारी असणार आहे. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी या संदर्भातील आदेश मंगळवारी (ता. एक) काढले आहेत.
जिल्ह्यातील टाळेबंदी 30 सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आले आहे, असे असले तरी जिल्हावासीयांना आता दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील प्रमुख आस्थापना आता सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू होणार आहेत. यापूर्वी या सर्व आस्थापना दुपारी तीन वाजेपर्यंत सुरू होत्या. त्यामुळे बाजारांमध्ये गर्दी होत असे. परिणामी आस्थापनांची वेळ वाढवण्याची मागणी जिल्हावाशियाकडून केली जात होती.
नुतन जिल्हाधिकारी यांनी यासंदर्भात सकारात्मकता दाखवत प्रमुख आस्थापनांची वेळ सायंकाळी पाच वाजेपर्यंत केली आहे. अत्यावश्यक सेवा आता सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. महामार्गाच्या बाजूचे सर्व धाबे २४ तास सुरू ठेवणार परवानगी देण्यात आली आहे. जिल्हाभरातील हॉटेल रात्री दहा वाजेपर्यंत पार्सल सेवा उपलब्ध करून देण्यात परवानगी देण्यात आली आहे.
प्रणवदांच्या शिक्षणावरील मंथनाने भारावले होते लातूरजन
जनता संचारबंदी रविवारी
आठवड्यातील प्रत्येक शनिवारी जनता संचारबंदी पाळला जात होता. प्रमुख आस्थापनाही या दिवशी बंद ठेवण्याचा निर्णय तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी घेतला होता. हा जनता संचारबंदीआता शनिवारऐवजी रविवारी ठेवण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता आठवड्यातील सहा दिवस नागरिकांना काम करण्याची संधी मिळणार आहे.
(संपादन - गणेश पिटेकर)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.