फुलंब्री : राष्ट्रीय महामार्ग विभागातर्फे औरंगाबाद-जळगाव महामार्गाची डागडुजी करताना मजूर.
फुलंब्री : राष्ट्रीय महामार्ग विभागातर्फे औरंगाबाद-जळगाव महामार्गाची डागडुजी करताना मजूर.  
मराठवाडा

मुख्यमंत्र्यांच्या यात्रेमुळे महामार्गावर डागडुजी

नवनाथ इधाटे

फुलंब्री, ता. 26 (जि.औरंगाबाद) : औरंगाबाद-जळगाव महामार्गाचे काम वर्षभरापासून सुरू असून, कामाच्या नियोजनाअभावी वर्षभरापासून सर्वसामान्य नागरिकांना कधी धूळ, तर कधी चिखलाचा सामना करावा लागला. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेक निष्पाप लोकांचे बळी गेले. यावेळी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित कंत्राटदाराकडे दुर्लक्ष केले; परंतु 28 ऑगस्टला औरंगाबाद ते फुलंब्रीदरम्यानच्या महाजानादेश यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रवास करणार असल्याने राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी खडबडून जागे झाले.

महामार्गावरील खड्ड्यांना ठिगळाचा आधार देण्याचा सपाटा मागील तीन-चार दिवसांपासून त्यांनी सुरू केला. त्यामळे किमान मुख्यमंत्र्यांच्या महाजानादेश यात्रेमुळे तरी या महामार्गाची डागडुजी होत आहे. या महामार्गावर ठिकठिकाणी खोदकाम, अर्धवट बुजविलेले खड्डे आणि मुरूम टाकलेल्या रस्त्यावरून दररोज जाणाऱ्या-येणाऱ्या शेकडो वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. काम सुरू असताना सुरवातीला उन्हाळ्यात धुळीचा, आता पावसाळ्यात चिखलाचा त्रास वाहनचालकांना होत आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे कंत्राटदाराने मनमानी पद्धतीने काम केले.

परिणामी संबंधित कंपनीचा व्यवस्थापकच पळून गेल्याने महामार्गाचे काम रखडले आहे. उन्हाळ्यात धूळ, पावसाळ्यात चिखलाचा त्रास झाला. त्यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी गप्प राहिले. सध्या तर त्रासाची माहिती घेण्याची तसदीही अधिकाऱ्यांनी घेतली नाही. आठ दिवसांपूर्वी औरंगाबाद-फुलंब्री-सिल्लोड या महामार्गावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: महाजानादेश यात्रेच्या निमित्ताने प्रवास करणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर या विभागाचे अधिकारी खडबडून जागे होऊन रस्त्यावर ज्या ठिकाणी धूळ उडते, चिखल होतो, खड्डे पडलेले आहेत, अशा ठिकाणी डांबराचे ठिगळ देऊन रस्ता सुस्थितीत करण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुरू केले आहे. इतक्‍या दिवसांपासून जनता ओरड करीत असताना त्यांचा आवाज अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचलाच नाही. किमान मुख्यमंत्र्यांच्या जनादेश यात्रेमुळे महामार्गावर डागडुजी सुरू आहे.

मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा
या महामार्गाचे काम ऋत्त्विक कंपनीला देण्यात आले होते. संबधित कंपनीने छोटे-मोठे काम स्थानिक कंत्राटदारांना विभाजन करून दिले. मात्र, स्थानिक कंत्राटदारांचे कोट्यवधी रुपयांचे बिल थकल्याने आतापर्यंत दोनवेळा मजूर, कंत्राटदारांनी ऋत्त्विक कंपनीच्या पाथ्री (ता. फुलंब्री) येथील कार्यालयाला टाळे ठोकले. महिनाभरापासून संबंधित कंपनीच्या प्रकल्प व्यवस्थापकासह काही अधिकारी पळून गेल्याने सर्व कामे ठप्प झाली आहेत. मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून रस्त्याचे काम जलद गतीने करण्याच्या सूचना अधिकारी, कंपनीला द्याव्यात, अशी अपेक्षा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकली; मुंबईसाठी करो या मरो सामना

तुम्हाला पत्रावळीवर जेवायची इच्छा झाली आणि तुम्ही वाटोळे करून घेतलं; जितेंद्र आव्हाड यांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

Ulhasnagar News : उल्हासनगरातील बेवारस वाहने पालिकेच्या रडारवर; 11 वाहन मालकांकडून 17 हजाराचा दंड वसूल

SCROLL FOR NEXT