जालना - कडवंची गावचे सरपंच चंद्रकांत क्षीरसागर यांच्या शेतातील शेततळे.
जालना - कडवंची गावचे सरपंच चंद्रकांत क्षीरसागर यांच्या शेतातील शेततळे. 
मराठवाडा

लोकसहभागातून कडवंचीत जलक्रांती

सकाळवृत्तसेवा

सलग तीन वर्षे दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या जालना जिल्ह्याने यंदा पावसाची सरासरी ओलांडली. दमदार पावसामुळे नदी-नाले-तुडुंब भरून वाहिले. बागायतदार शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा झाला. कडवंची (ता. जालना) ग्रामस्थांनी तब्बल ४५० शेततळी व लोकसहभागातून केलेले पंधरा किलोमीटर नाला खोलीकरणच्या मदतीने मदतीने बाराशे एकर क्षेत्रावर उत्तम पद्धतीने द्राक्ष बागांचे व्यवस्थापन केले आहे. जलसंधारणाच्या या पॅटर्नमुळे कडवंची गावाने राज्यात आपली द्राक्षबाग व शेततळ्यांचे गाव, अशी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

येथील लहान व मोठ्या बागायतदार शेतकऱ्यांनी मिळून तब्बल ४५० शेततळी खोदली आहेत. यातील २५० शेततळी राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, सामुदायिक शेततळी या योजनांमधून पूर्ण करण्यात आली आहेत. उर्वरित दोनशे शेततळी शेतकऱ्यांनी स्वखर्चाने खोदली आहे. गावचे सरपंच चंद्रकांत क्षीरसागर यांच्याकडे दोन शेततळी असून, पैकी एका शेतळ्याची पाणी साठवण क्षमता तब्बल अडीच कोटी लिटर एवढी आहे.

महत्त्वाचे म्हणजे इंडो जर्मन पाणलोट विकास क्षेत्रांतर्गत काही वर्षांपूर्वी जलसंधारणाची कामे झाल्यामुळे कडवंची गावाला जलयुक्त शिवार योजनेच्या पहिल्या टप्प्यातून वगळण्यात आले. त्यानंतर गावकऱ्यांनी एकत्र येऊन लोकसहभागातून गावाजवळून वाहणाऱ्या नाल्याचे खोलीकरण करण्याचा निर्णय घेतला. ३५ लाखांच्या लोकवर्गणीतून पंधरा कि.मी. नाल्याचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले. या वर्षी झालेल्या दमदार पावसामुळे कडवंचीत महाजलक्रांती घडली आहे. पंधरा किलोमीटरचा नाला पाण्याने इंच-इंच भरलेला आहे. परिणामी शिवारातील पाणीपातळीत वाढ झाली आहे. पूर्ण क्षमतेने भरलेली शेततळी, नाला खोलीकरणात अडविलेले पाणी, तुडुंब भरलेल्या विहिरी यामुळे गावाला आणखी दोन वर्षे पुरले एवढे पाणी उपलब्ध आहे.

जलयुक्त शिवार अभियानातून जालना जिल्ह्यात झालेल्या कामामुळे सिंचन क्षेत्रासह जमिनीची पाणीपातळी वाढण्यास मदत झाली आहे. लोकसहभाग हे जलयुक्त शिवारचे यश असून, अनेक गावांत लोकवर्गणीतून मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. अनेक गावांना खोलीकरणाच्या कामासाठी शासकीय पोकलेन मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यापुढील काळात अभियानांतर्गत सुरू असलेल्या कामांची गती वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील. 
- दशरथ तांभाळे , सदस्य सचिव, जलयुक्त शिवार अभियान, जालना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Raghuram Rajan: संपत्ती वितरणावर रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सोलापुरात सभा

दहा मिनिटांमध्ये लिहिलेल्या मंगलाष्टका अन् मोहन जोशींचा किस्सा; 'असा' शूट झाला होता राधा-घनाच्या लग्नाचा एपिसोड

SCROLL FOR NEXT