Raosaheb Danve
Raosaheb Danve 
मराठवाडा

उद्धव ठाकरेंचे वक्तव्य राजकीय भाषणबाजी : दानवे

हरी तुगावकर

लातूर : अयोध्येत जावून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यांना त्याचा राजकीय फायदा होणार नाही. त्यांनी तेथे जावून पंतप्रधान नरेंद्र मोदीवर केलेली टीका ही राजकीय भाषणबाजी आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे पाटील यांनी येथे केली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर पक्षाच्या कामाचा आढावा घेण्य़ासाठी दानवे ऱविवारी (ता. २५) येथे आले होते. येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शनिवारी (ता. २४) शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आयोध्येत जावून झोपलेल्या कुंभकर्णाला जागे करण्यासाठी येथे आलो आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदीवर केली होती. यावर बोलताना श्री. दानवे म्हणाले, `राम मंदिर हा मुद्दा नवीन नाही. १९९० पासून या मुद्यावर शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या सोबत होती. हा निवडणुकीचा मुद्दाच होवू शकत नाही. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे आयोध्येत गेले त्यांचे स्वागत आहे. पण त्यांना याचा राजकीय फायदा होणार नाही. तेथे जावून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीवर टीका केली. ती राजकीय भाषणबाजी होती. शिवसेनेने राम मंदिराचा मुद्दा उचलला असला तरी भारतीय जनता पक्षाला तोटा होणार नाही. भाजप हा विकासाचा अजेंडा घेवूचन लोकसभा निवडणूक लढणार आहे.`

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक समविचार पक्षानी एकत्र येवून लढवावी ही भाजपची इच्छा आहे. मत विभाजनाचा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा होवू नये हे आमचे प्रयत्न आहेत. त्यामुळे शिवसेनेशी युतीचा आमचा प्रयत्न असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मराठा आरक्षणावरून भाजप समाजात दुही पाडत आहे, अशी टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली होती, यावर बोलताना दानवे म्हणाले, `मराठा समाजाला आरक्षण द्यावे असा कार्यकारणीत ठराव घेणारा भाजप हा एकमेव पक्ष आहे. त्या करीता आम्ही विधानसभेत कायदा केला. मागासवर्गीय आयोगाच्या शिफारसीवरून निर्णय घेतला आहे. व्होट बँक म्हणून निर्णय घेतला नाही. जनता आता विकासाला प्राधान्य देत आहे.`

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले तरी त्याचा काहीही परिणाम होणार नाही. त्यांच्यावर राज्यातील जनतेचा विश्वासच राहिला नाही. आगामी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत त्यांच्यापेक्षा भाजप जास्त जागा जिंकेल असा विश्वासही श्री. दानवे यांनी व्यक्त केला. यावेळी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, खासदार डॉ. सुनील गायकवाड, आमदार विनायक पाटील, माजी आमदार गोविंद केंद्रे, गणेश हाके, नागनाथ निडवदे, शैलेश लाहोटी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SEBI Notice: अदानींना मोठा धक्का! समूहाच्या सहा कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस; काय आहे कारण?

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : सुप्रिया सुळे अन् सुनेत्रा पवार यांना निवडणूक आयोगाची नोटीस

SCROLL FOR NEXT