Latur Municipal Corporation News, Coronavirus  
मराठवाडा

घरपोच जीवनावश्‍यक वस्तू पोचविण्यासाठी पुढे या, लातूरच्या महापौरांचे दुकानदारांना आवाहन

सकाळ वृत्तसेवा

लातूर ः कोरोना विषाणुचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यात जीवनावश्क वस्तूला सूट देण्यात आली आहे. पण नागरिकांनी बाहेर पडून गर्दी करू नये याचीही काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे शहरातील किराणा दुकानदारांनी किराणा मालाची घरपोच देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केले आहे.


शहरातील किराणा, भाजीपाला, फळ, दूध, बेकरी, मांस, खाण्या पिण्याच्या वस्तूंच्या सर्व दुकानदारांनी घरपोच देण्याकरीता पुढाकार घ्यावा. या करिता आपणास ओळखपत्र देण्यात येऊन आपल्या वाहनांना विशेष परवानगी देण्यात येणार आहे. सेवा केवळ शक्यतो आपल्या प्रभाग व आसपासच्या परिसरात घरपोच द्यावी. आपल्या दुकानाच्या नावासह मोबाईल क्रमांक याची यादीसह माहिती द्यावी. आपण ही सुविधा पुरवू शकत असाल व पुरवठा करण्यासाठी आपले वाहन असल्यास या ९१६८६४०७१० या क्रमांकावर संपर्क साधावा. या उपाय योजनेअंतर्गत मोजक्याच व्यावसायिकांना परवानगी देण्यात येणार आहे. तरी संबंधीत दुकानदारांनी आपले नाव, दुकानाचे नाव व पत्ता, मोबाईल, उपलब्ध वस्तू, प्रभाग क्रमांक यासह माहिती द्यावी, असे आवाहन श्री.गोजमगुंडे यांनी केले आहे.

वाचा ः कोरोनामुक्तीच्या संकल्पाने लातूरात नववर्षाचे स्वागत, गुढी घरोघरी उभारली

नाकाबंदीने घेरले लातूर शहराला
लातूर, ता. २४ ः कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आता राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यातही १४४ कलम लागू करण्यात आले आहे. शहरातही पोलिसही सतर्क राहत आहेत. यातून शहरात १५ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. शहरात चारही दिशांनी बाहेरून येणाऱ्या वाहनधारकांची कसून चौकशी केली जात आहे; तसेच शहरात देखील विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. एकप्रकारे पोलिसांच्या नाकाबंदीने शहराला घेरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पोलिसांनी नाकाबंदी करून चौकशी सुरू केल्याने विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची संख्याही कमी होत आहे. कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून सर्वच स्तरावर उपाययोजना केल्या जात आहेत. शहरात कोणत्याच ठिकाणी गर्दी होणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे.

त्यात राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यातही १४४ कलम लागू करण्यात आली आहे. पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यावर बंधने आली आहेत. त्यात रस्त्यावर विनाकारण कोणी फिरणार नाही याची काळजी पोलिस घेत आहेत. शहर पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात सुमारे पंधरा ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. येथील नांदेड रस्त्यावरील कृषी महाविद्यालय, अंबाजोगाई रस्त्यावर, औसा रस्त्यावर, बारा नंबर पाटी, हत्ते कॉर्नर, दयानंद गेट, आंबेडकर चौक, बसवेश्वर चौक, पोलिस मुख्यालय अशा ठिकाणी ही नाकाबंदी करण्यात आली आहे. या रस्त्यावरून येणाऱ्या वाहनधारकांची पोलिस चौकशी करताना दिसत आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT