crop
crop 
मराठवाडा

मराठवाड्यात रब्बी पेरणीची चिंता

सुषेन जाधव

औरंगाबाद : दिवसेंदिवस जमिनीतील ओलावा कमी होत चालला असून परतीच्या पावसानेही पाठ फिरवल्याने रब्बी पेरणी करावी कशी? अशी धास्ती शेतकऱ्यांना पडली आहे. यामुळे मराठवाड्यात दुष्काळसदृश्य परिस्थितीचे चित्र अधिकच गडद होत चालले आहे. 

मराठवाड्यातील 76 पैकी 56 तालुक्यात 20 ते 53 टक्क्यापेक्षा कमी पाऊस झाला आहे. यामध्ये देगलूर (जि. लातूर) 44 टक्के, खुलताबाद व पैठण (जि. औरंगाबाद) 47 टक्के पाऊस झाला आहे. मराठवाड्याच्या 48 लाख हेक्टरवरील कपाशी, सोयाबीन, मका आदि पिके पाण्याअभावी जळून जात आहेत. सध्याच्या दिवसातच जमिनीत ओलावा नसल्याने येणाऱ्या रब्बी हंगामातील पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. 

असमान पावसाचा फटका 
मराठवाड्यात 656 मिलिमीटर पाऊस अपेक्षित पावसाच्या तुलनेत 466 मिलिमीटर पाऊस झाला असला तरी या पर्जन्याचे वितरण हे असमान व खंडप्राय झालेले आहे. यामध्ये 35 दिवसांचा खंड पडल्याने मूग, उडीद सारखी पिके पूर्णपणे गेल्याचे चित्र आहे.

प्रशासनाचे बेजबाबदार धोरण
एकीकडे पाऊस नाही, तर दुसरीकडे उपलब्ध पाणीसाठा असलेल्या शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी वीज उपलब्ध नाही, हेच कमी की काय म्हणून याही परिस्थितीत मोठ्या प्रमाणात विजबिले शेतकऱ्यांच्या माथी मारली जात आहेत. प्रशासनाच्या या बेजबदार धोरणाचं सरकारलाही काही पडलेले नसल्याचा संताप शेतकऱ्यातून वक्त होत आहे. 

अस्मानी सुलतानी संकटांनी शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. सरकारने आढे वेढे घेत बसण्यापेक्षा 15 नोव्हेंबर पर्यंत दुष्काळ जाहीर करावा. अन्यथा शेतकरी आंदोलनाचा पवित्रा घेतील. 
अशोक पाटील हूड, अध्यक्ष, राष्ट्रीय किसान परिषद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT