मराठवाडा

ठाणे पोलिस, आरटीओतून संशयितांची घेतली जातेय माहिती 

सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - वर्धन घोडे खून प्रकरणातील संशयित आरोपी श्‍याम मगरे हा मुंबईत वास्तव्य करीत होता. त्या कालावधीतील त्याची माहिती औरंगाबाद पोलिसांनी मागवली असून, यासबंधीचे पत्र कळवा (जि. ठाणे) पोलिसांना पाठवले आहे. तसेच अभिलाषच्या सर्व वाहनांची आरटीओतून माहिती मागवण्यात आली आहे. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, घोडे कुटुंब मूळ कोकणातील असून ठाणे, कळवा येथील मनीषानगर भागात राहत होते. 22 फेब्रुवारी 2010 ला वर्धनचे वडील विवेक घोडे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. विवेक हे ठाणे जिल्हा कॉंग्रेसच्या मानवाधिकार विभागाचे कळव्याचे ब्लॉक उपाध्यक्ष होते. डोक्‍यात गोळी लागल्याने 28 फेब्रुवारीला उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात कळवा पोलिस ठाण्यात खुनाच्या गुन्ह्याची नोंद झाली. विशेषत: वर्धनच्या खून प्रकरणातील श्‍याम मगरे हा आधी मुंबईतही राहत होता. खुनाच्या पंधरा दिवसांपूर्वी तो शहरात आला. 

विवेक घोडे यांच्या सहा वर्षांपूर्वीच्या खुनाचा व वर्धनच्या खुनाचा परस्पर सबंध आहे का, याची पडताळणी पोलिस करीत आहेत. श्‍याम मगरेचा पहिल्या खुनाशी सबंध आहे का, याबाबतही चौकशीसाठी कळवा पोलिसांना पत्र पाठवण्यात येणार आहे. 

वाहनांची माहिती मागविली 
संशयित आरोपी अभिलाषकडे काही वाहने आहेत. त्यासह गुन्ह्यात वापरलेली उघडी कार मुंबई पासिंगची आहे. या सर्व वाहनांची आरटीओ कार्यालयाकडून पोलिसांनी माहिती मागवली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: पुण्यात १० मे रोजी राज ठाकरेंची सभा; मोहोळ यांचा करणार प्रचार

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT