मुंबई - राज्य परिवहन विभागाने (आरटीओ) मुंबई परिवहन आयुक्त कार्यालयातील उपायुक्त भालचंद्र यांच्यासह एकूण १६ अधिकाऱ्यांना निलंबित केले. वाहनांना फिटनेस प्रमाणपत्र देताना अनियमितता झाल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
पुण्यातील श्रीकांत कर्वे यांनी उच्च न्यायालयात या संदर्भात याचिका केली होती. या प्रकरणी यापूर्वी ३७ अधिकाऱ्यांना निलंबित केले होते.
कर्वे यांनी २०१३ मध्ये याचिका दाखल केली होती. त्यांनतर उच्च न्यायालयाने यावर सुनावणी देत दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले होते; मात्र परिवहन विभागाकडून टाळाटाळ होत असल्याचे पाहून परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवरच कारवाई का केली जाऊ नये, असा प्रश्न उपस्थित झाला होता. उच्च न्यायालयात नियमित सुनावणी सुरू असतानाही कारवाई होत नसल्याने कर्वे यांनी ‘सिव्हिल’ अर्ज केला होता. त्यावरून न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याचा ठपका या अधिकाऱ्यांवर ठेवला. त्यामुळे ‘आरटीओ’ने १६ अधिकाऱ्यांना निलंबित केले. दरम्यान, याचिकाकर्ते श्रीकांत कर्वे यांनी याचिका दाखल केल्यानंतर आदेशाने व्हिडिओ तपासणीसाठी एकसदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली होती.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.