कर्जत : दहिवली येथील श्रीराम पूल.
कर्जत : दहिवली येथील श्रीराम पूल. 
मुंबई

उल्हास नदीवरील चार नव्या पुलांना मंजुरी

सकाळ वृत्तसेवा

नेरळ (बातमीदार) : कर्जत तालुक्‍यातील उल्हास नदीवर पाच नवीन पूल बांधावेत, अशी अनेक वर्षांपासून मागणी केली जात होती. त्यातील चार पुलांच्या बांधकामांना सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजुरी दिली आहे. त्यासाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात तब्बल २० कोटींची तरतूद केली आहे.

कर्जत तालुक्‍यातील उल्हास नदीवर नवीन पूल असावेत; जेणेकरून वाहतूक कोंडी कमी होईल, अशी मागणी पुढे रेटली जात होती. स्थानिक आमदार म्हणून सुरेश लाड याबाबत गेली काही वर्षे सातत्याने पुलांची मागणी करीत होते. या वर्षीच्या अर्थसंकल्पात कर्जत तालुक्‍यातील मागणी होत असलेल्या पाच पुलांपैकी चार पुलांचे बांधकाम करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे भविष्यात होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होऊ शकणार आहे.

पुढील दोन वर्षांत त्या सर्व पुलांची उभारणी पूर्ण करण्याचे आदेश सरकारने निविदेत दिले आहेत; मात्र तालुक्‍यातील दहिवली-मालेगाव येथे असलेला कमी उंचीचा पूल पावसाळ्यात सतत पाण्याखाली जातो. त्यामुळे तेथे जास्त उंचीचा पूल बांधण्याची मागणी गेल्‍या कित्‍येक वर्षांपासून होत आहे.

सरकारने त्या पुलाच्या कामास मान्यता दिली नाही. या वर्षी या पुलावरून दोन वेळा; तर ३०-३० तास पुराचे पाणी वाहत होते. त्यामुळे ३५ वर्षांपूर्वीचा हा पूल धोकादायक बनला आहे.

शेलू-मोहिली यांना जोडणारा पुलाच्या बांधकामास मंजुरी दिली असून, पुलाचे अंतर २०० मीटर असल्याने स्थापत्य अभियंते यांच्यासाठी पूल आव्हान असाच आहे. शेलू येथील गणेश घाट येथे या पुलाला सुरुवात होणार आहे. याच उल्हास नदीवर चांदई येथे पूल बांधण्यात येणार आहे. सध्या असलेल्या अरुंद पुलाच्या बाजूला नवीन पूल उभारला जाणार आहे. 

चिंचवली-कडाव-तांबस-जांभिवली-वेणगाव-दहिवली-कोंडीवडे या राज्यमार्ग रस्त्यावर असलेला हा पूल आवश्‍यक बाब होता, त्या ठिकाणी सध्या असलेल्या पुलाच्या बाजूला गणेश घाटालगत हा पूल होणार आहे. त्‍यामुळे या मार्गावरील वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे.

वाहतूक कमी होण्यास मदत होणार
उल्हास नदीवर आमराई येथील श्रीराम पूल येथे नवीन पूल मंजूर झाला असून, या पुलाची मागणी अनेक वर्षांपासून सुरू आहे. पुलाच्या बांधकामामुळे कर्जत-मुरबाड रस्त्यावरील वाहतूक कमी होण्यास मदत होणार आहे. शिरसे येथील या पुलामुळे नेवाळी, मोहिली, आवळस या भागातील आणि पळसदरी स्टेशजकडे जाणाऱ्या लोकांसाठी जवळचा मार्ग उपलब्ध होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

IPL Toss Fixing : कॅमेरा टॉसकडे जाताच रेफ्री आला मध्ये; मुंबईचा टॉस पुन्हा वादात, व्हिडिओ होतोय व्हायरल

Rohith Vemula: "रोहित वेमुला दलित नव्हता"; पोलिसांनी बंद केली केस; स्मृती ईराणी, दत्तात्रेय यांना क्लीनचीट

Pakistan Moon Mission: भारताचे 'चांद्रयान' कॉपी करण्यासाठी निघाला PAK, चीनच्या रॉकेटने केले प्रक्षेपित! आता होत आहे ट्रोल

Latest Marathi News Live Update : मुंबई स्थानकावर अमरावती एक्सप्रेसला किरकोळ आग

SCROLL FOR NEXT