मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर 7 ऑगस्टपासून किसान रेलची मालवाहतूक सुरू आहे. आता देवळाली आणि मुजफ्फरपूरदरम्यान आठवड्यातून तीन दिवस धावत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, 2 ऑक्टोबरपर्यंत सुमारे 19 फेऱ्यांमध्ये 5223 टन मालाची वाहतूक करण्यात केली आहे. यामध्ये किसान रेलमध्ये डाळिंब, कॅप्सिकम, हिरवी मिरची, आले, लिंबू, बर्फावरील मासे यासारख्या नाशवंत मालाची वाहतूक केली जाते. डाळिंब 2039 टन, मिक्स भाज्या 1303 टन व इतर वस्तूंची वाहतूक केली गेली.
किसान रेलमध्ये शेती उत्पादनांची बुकिंग करण्याची नवीन सुविधा पीओएस मशीन बसविण्यासह सोलापूर विभागातील सांगोला, मोडलिंब, बेलवंडी, बेलापूर आणि कोपरगाव स्थानकांवर केल्यामुळे व्यवसाय आणि त्वरित व्यवहार सुलभ होण्यासह शेतकऱ्यांना फायदा होत असल्याचे मध्य रेल्वेने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.