मुंबई

565 तळीराम चालकांची उतरली 

सकाळवृत्तसेवा

मुंबई - मद्यधुंद अवस्थेत गाड्या चालवणारे 565 जण 31 डिसेंबरच्या रात्री वाहतूक पोलिसांच्या कचाट्यात सापडल्याने त्यांची उतरली, तर सुसाट गाड्या चालवणाऱ्या 13 जणांना दंड केल्याने त्यांना धडा मिळाला आहे. 

पोलिसांनी 31 डिसेंबरच्या रात्री तळीराम चालकांना पकडण्यासाठी ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवला होता. नाकाबंदीही केली होती. सिग्नल तोडणे, वेगाने वाहन चालवणे, ट्रिपल सीट आणि विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांना पोलिसांनी अडवले. गिरगाव चौपाटीवर वाहतूक कोंडीमध्येही स्टंटबाज सुसाट दुचाकी चालवत होते. जागोजागी बंदोबस्त असूनही अनेक वाहने आणि दुचाकी सुसाट जात होत्या. ही सर्व वाहने नाकाबंदीच्या कचाट्यात सापडत होती. 

पोलिसांनी रविवारच्या पहाटेपर्यंत 565 मद्यपी चालकांवर कारवाई केली. गेल्या वर्षी ही सख्या 705 होती. व्यापक बंदोबस्तामुळे यंदा हे प्रमाण कमी झाले असावे, असे पोलिसांचे म्हणणे आहे. नशेत बेधुंद वाहने चालवणाऱ्या 13 जणांना पोलिसांनी दंड केला. विनाहेल्मेटने मोटरसायकल चालवणाऱ्या 207 जणांनाही दंड करण्यात आला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Rohit Sharma Birthday : 'सलाम रोहित भाई...' मुंबईने टीम इंडियाच्या कर्णधारचा बड्डे अनोख्या पद्धतीने केला साजरा - Video

VIDEO: वडील असावेत तर असे! घटस्फोट झालेल्या मुलीचे माहेरी केले जंगी स्वागत; व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : पियुष गोयाल आज भरणार उमेदवारी अर्ज

SCROLL FOR NEXT