मुंबई

एकीकडे वडिलांचा मृतदेह, दुसरीकडे परीक्षा; तरीही विद्यार्थ्याने मिळवले यश; कुटुंबीयांच्या डोळ्यात तरळले अश्रू 

जीवन तांबे

चेंबूर : ऐन दहावीची परीक्षा सुरू असतानाच वडिलांचा मृत्यू झाला. त्यामुळे परिक्षाला बसावे की, नाही असा प्रश्न मनात घोळत असतानाच बापाने दिलेल्या शिक्षणाचे महत्त्व ओळखून त्याने सरळ परिक्षा केंद्र गाठले. परीक्षा देऊन घरी आल्यानंतर वडिलांना अग्नी दिला. चेंबूरमधील संदेश साळवे या विद्यार्थ्याची ही कहाणी. दहावीच्या निकालात 53.20 टक्के गुण मिळवत तो उत्तीर्ण झाला. तेव्हा तो दिवस आठवून आजी, आजोबा व आई आणि संदेशच्याही डोळ्यात पाणी आले. 

चेंबूर टिळक नगर परिसरातील पंचशील नगर एसआरए इमारतीतील आठव्या मजल्यावर राहणारे परमेश्वर साळवे यांचा गेल्यावर्षी मार्चमध्ये कर्करोगाने निधन झाले. आपले आई, वडील, पत्नी आणि दोन मुलांसह ते राहत होते. त्यांच्या जाण्याने कुटुंबावर मोठे दुःख कोसळले. त्याचदिवशी परमेश्वर यांचा मुलगा संदेशचा दहावी परीक्षेचा पेपर होता. एकीकडे घरात वडिलांचा मृतदेह आणि दुसरीकडे परीक्षा अशा विचित्र मनस्थितीत असलेल्या संदेशने प्रथम दुःख बाजूला सारून दहावीचा पेपर देण्याचे ठरवले आणि परीक्षा केंद्र गाठले. परिक्षा देऊन आल्यानंतर कुटुंबांनी त्याच्या वडिलांचे अंत्यसंस्कार केले होते.

पोलिस होण्याची इच्छा
संदेश आज दहावी परिक्षेत 53.20 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाल्याने घरातील सर्वांच्यांच डोळ्यात अश्रू तरळले. वडिलांनी दिलेला शिक्षणाचा मंत्र याच्या जोरावरच मी दहावी पास झालो आहे. आता बारावी उत्तीर्ण होऊन पोलिस दलात भरती व्हायचे आहे, अशी इच्छा संदेशने व्यक्त केली आहे

-----------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: अक्षर पटेलने दिल्लीला मिळवून दिलं पहिलं यश; सुनील नारायण स्वस्तात बाद

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT