जव्हार ः अतिवृष्टीमुळे जव्हार तालुक्यातील जव्हार-चौथ्याची वाडी हा रस्ता पूर्णपणे वाहून गेल्याने त्याची तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली असली, तरी अजूनही एका बाजूला भराव अपूर्ण असल्याने बुधवारी (ता.२७) सायंकाळी साडेपाच वाजता सुटलेली जव्हार ते चौक अशी निघालेली बस घसरत खाली गेली; मात्र चालकाने दाखवलेल्या हुशारीमुळे अपघात टळून ४० ते ४५ विद्यार्थी थोडक्यात वाचले, अशी माहिती उपस्थित ग्रामस्थांनी दिली.
अतिवृष्टीमुळे जव्हार-चौथ्याची वाडी खडतर झालेला प्रवास थांबवण्यासाठी चौथ्याची वाडी, साकुर, धानोशी या गावातील तरुणांनी भराव टाकून रस्ता तयार केला; मात्र कित्येक दिवस येथील कामाकडे दुर्लक्षच करण्यात आल्यामुळे बुधवारी या मार्गावरून निघालेली जव्हार-चौकही बसही येथून घरसत गेली; ब्रेक लावूनही गाडी थांबली नाही; मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे गाडी समोरच्या उभ्या कठड्यावर नेऊन दाबल्यामुळे मोठा अपघात टळला.
दरम्यान, या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, संपर्क होऊ शकला नाही.
ऑगस्टपासून हा रस्ता बंद आहे. त्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांना १० किलोमीटर चालत जावे लागत आहे. रुग्णांना १५ किलोमीटर फेरा मारून उपचारासाठी न्यावे लागत आहे. आम्ही गेले चार महिने रस्तादुरुस्तीची मागणी करत आहे; मात्र त्यावर कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे येथे अपघात घडल्यास त्यास सर्वस्वी बांधकाम विभाग जबाबदार राहील.
शांताराम मोहोडकर, माजी ग्रामपंचायत सदस्य, धानोशी
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.