मुंबई

Loksabha 2019 :  उमेदवारीबरोबरच राजेंद्र गावित टीकेचे धनी 

संदीप पंडित

विरार - लोकसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून पालघर लोकसभा मतदारसंघ सर्वांच्या चर्चेचा विषय झाला आहे. युती-आघाडीपूर्वी एकमेकांवर निशाणा साधणारे पक्ष सत्तेसाठी पुन्हा एकत्र आले आहेत; तर उमेदवारीसाठीही पक्षांची अदलाबदली सुरू आहे. पक्षांच्या बदलत्या राजकीय समीकरणांमुळे कार्यकर्तेही संभ्रमात आहेत. या निवडणुकीच्या धामधुमीत मतदार राजाचे मात्र चांगलेच मनोरंजन होत असून समाजमाध्यमांवर याची जोरदार चर्चा रंगली. यात पोटनिवडणुकीत विस्तवही जात नसलेल्या शिवसेना आणि भाजपच्या युतीवर आणि उमेदवारीसाठी वारंवार पक्षांतर करणारे त्यांचे उमेदवार यांची म्हणी, गाण्यांद्वारे खिल्ली उडवली जात असून त्याला चांगलीच पसंती मिळत असून त्यावर लाईक्‍सचा पाऊसही पडत आहे. 

समाजमाध्यमांवर युतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्यावरील उपरोधिक टीका चांगलीच गाजत आहे. याशिवाय आदिवासी जिल्हा असूनही शिवसेना-भाजपला स्थानिक उमेदवार मिळत नाही, अशी टीका युतीवर केली जात आहे. "केवळ मानोरंजन म्हणून आयपीएल पाहणाऱ्यांना आता युतीच्या सभांचा बोनसही मिळणार', "त्या वनगा कुटुंबीयांचे काय झाले? न्याय पोस्टपॉन्ड झाला की काय?', असा प्रश्‍नही काहींनी विचारला आहे. "बात जबान से और तिर?' (धनुष्यबाण), "कुणी म्हणे ही असेल चोरी, कुणा वाटते असे उधारी, शर्यत घोडा चौखूर सुटला वेचियले मग दाम, जितुके मालक, तितकी नवे, हृदय जितकी याची गवे, कुणी न ओळखी, तरीही त्याला दिन अनाथ अनाम', अशी गाणीही काहींनी तयार केली असून या उपरोधित टीकेची राळ समाजमाध्यमवर सध्या चांगलीच सुरू आहे. 

जुने व्हिडीओ पुन्हा अपलोड 
काहींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी पोट निवडणुकीत एकमेकांवर केलेल्या टीकेचे व्हिडीओही अपलोड केले असून समाजमाध्यमावर ते चांगलेच हिट होत आहेत. शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते नाराज असून भाजपमध्येदेखील बंडखोरीची लागण झाली आहे. त्यातच समाजमाध्यमांवर रंगलेल्या या चर्चांमुळे पालघरमधील लोकसभा निवडणुकीत टीका-टीपणींना उधाण आले आहे. 

या मेसेजना जास्त लाईक्‍स 
- आता हा सांगू की तो सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, उड्या मारू चला, गुलाल उधळू चला, आला आला ग आयाराम आला. 
- ब्रेकिंग न्यूज म्हणून "कॉंग्रेसचे उमेदवार गावित साहेब, भाजपचे उमेदवार गावित साहेब, शिवसेनेचेही उमेदवार गावित साहेबच, आपण फक्त यांना मतदान करायचे.' 
- "मूळ गाव - नंदुरबार, वास्तव्य - मिरारोड, फक्त राजकारणासाठी पालघर जिल्हा, राजकीय पक्ष सांगता येत नाही, कार्यकार्ते- कधी कॉंग्रेस, कधी भाजप, तर आता शिवसेनेचे' 
- फक्त शिवधनुष्य हातात धरून कोणी अर्जुन होत नाही, त्यासाठी धनुर्विद्या (निष्ठा) प्राप्त करावी लागते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT