cm uddhav thackeray
cm uddhav thackeray  file photo
मुंबई

मुख्यमंत्री आज रात्री ८.३० वाजता काय घोषणा करणार?

दीनानाथ परब

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आज रात्री ८.३० वाजता सोशल मीडियावरुन जनतेला संबोधित करणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या संबोधनाकडे संपूर्ण राज्यातील जनतेचे लक्ष असेल. कारण मागच्या ५० दिवसांपासून लॉकडाउनमध्ये (lockdown) असलेल्या जनतेचे लक्ष अनलॉकच्या निर्णयाकडे लागले आहे. मुख्यमंत्री आज काय बोलतात ते महत्त्वाचे आहे. (Cm of maharashtra uddhav thackeray today will address people of state)

लॉकडाउनमुळे राज्यातील कोरोनाची स्थिती हळूहळू नियंत्रणात येत आहे. मुंबईत तर डबलिंग रेट ३५० दिवसांच्या पुढे गेला आहे. या परिस्थितीत मुख्यमंत्री निर्बंधांमधून किती सवलत देणार, याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. लॉकडाउनमुळे कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली असली, तरी लोकांची आर्थिक स्थिती खालावली आहे. हातावर पोट असणारी जनता, व्यापारी वर्ग अक्षरक्ष: मेटाकुटीला आला आहे.

मुख्यमंत्र्यांना अनेकांनी पत्र लिहून लॉकडाउन उठवण्याची मागणी केली आहे. ठाकरे सरकारमधील मंत्र्यांनी सरसकट लॉकडाउन उठवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. पण अनलॉकमध्ये दुकाने उघडण्यासह, प्रवास, जिल्हाबंदी रद्द करण्याचा निर्णय होणार ? हे पाहणे महत्त्वाचे आहे. मुंबईकरांसाठी लोकलचा विषय महत्त्वाचा आहे. कारण लोकल बंद असल्यामुळे प्रवासावर मर्यादा आल्या आहेत.

सध्या अनेकांचे वर्क फ्रॉम होम सुरु आहे. सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु होण्याची शक्यता धुसर दिसतेय. पण काही घटकांना लोकल प्रवासाची मुभा दिली जाऊ शकते. याआधी कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर अनेकांनी मुंबई लोकलला जबाबदार धरले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Hamas War : रमजानमध्ये संदेशवाहक पाठवून युद्ध थांबले, इस्राईल-हमास युद्धावर पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य

Latest Marathi News Live Update : उद्या जर बिभव स्वतः आले नाहीत तर...स्वाती मालीवाल प्रकरणात महिला आयोग आक्रमक!

खासदारांच्या दिलदार मित्रानेच चंद्रहार पाटलांचा बळी दिला; विशाल पाटलांनी कोणावर केला गंभीर आरोप

Dry Day: मायानगरीचा विकेंड कोरडाच! मुंबई आणि परिसरात 3 दिवस ड्राय डे, काय आहे कारण?

नळातून किंवा शॉवरमधून पाणी येत नसेल तर घरच्या घरी 'असे' करा दुरुस्त

SCROLL FOR NEXT