Mumbai Containment Zone
Mumbai Containment Zone 
मुंबई

बापरे! कंटेनमेंट झोन आणि तरीही मुक्तपणे संचार, वाचा

सकाळवृत्तसेवा

मुंबई : अंधेरीतील गिल्बर्ट हिलजवळील धनगरवाडी झोपडपट्टी सीलबंद करण्यात आली आहे, पण तरीही या परिसरात सर्वत्र मुक्तपणे संचार सुरु आहे. मात्र आम्हाला स्वच्छतागृहात जाण्यासाठी दूरच्या मार्गाने जावे लागत आहे, अशी तक्रार स्थानिक करतात. त्याचबरोबर कचऱ्याच्या विल्हेवाटीचाही प्रश्न झाल्याचे सांगितले जात आहे.  

मुंबई महापालिकेने शहरातील अनेक झोपडपट्ट्या सील केल्या आहेत. त्यात जोगेश्वरी ते विलेपार्ले दरम्यान असलेल्या झोपडपट्टीही आहे. जूहू गल्ली आणि धनगरवाडी येथील झोपडपट्टीही आहे. त्यात वीस हजाराची वस्ती आहे. सुमारे एका आठवड्यापूर्वी परिसर सील करण्याची प्रक्रिया सुरु केली, पण स्थानिकांनी अनेक अडथळे दूर केले आहेत. आम्हाला स्वच्छतागृहात जायला दुसरा रस्ता कुठे आहे, अशी विचारणा त्यावर स्थानिकांनी केली. 
परिसर सील करताना येथील लोकांची गरजा लक्षात घेतल्या नाहीत. स्वच्छतागृहात जाण्यासाठी लांबचा मार्ग कोणाला मान्य होईल. महिलांचे प्रश्न विचारातच घेतले नाहीत, असे येथील राजकीय कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

काही स्थानिकांनी स्वच्छतागृहाकडे जाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटला आहे, पण कचरा उचलण्याचे काय अशी विचारणा केली. काही स्वयंसेवा संस्था आमच्या परिसरातून कचरा गोळा करीत असत. मात्र ते दोन तीन दिवसांपूर्वीच आलेले नाही. त्यामुळे परिसराचीही स्वच्छता झालेली नाही. काही जण नियम पाळत नाहीत, स्वच्छता राखत नाहीत आणि यंत्रणेला दोष देतात, असेही काहींचे मत आहे. पोलिस किंवा महापालिका आधिकाऱ्यांबरोबर चर्चा न करताच काहींनी अडथळे दूर केले याकडेही ते लक्ष वेधतात.

Containment zone, yet freely communicated, read detail story

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

MI vs KKR : मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर कर्णधार पांड्याने कोणावर फोडले पराभवाचे खापर?

'कडकनाथ'चे बुडवलेले बाराशे कोटी आधी शेतकऱ्यांना द्या; सदाभाऊंचे भाषण सुरू असतानाच भर सभेत युवकाचा सवाल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला सोन्या-चांदीची खरेदी का केली जाते? जाणून घ्या कारण अन् महत्व

SCROLL FOR NEXT