मुंबई

किमान दोन दिवस थंडी मारणार दडी

सकाळवृत्तसेवा

मुंबई - थंडी गायब झाल्याने मुंबईत पुन्हा उकाडा जाणवत आहे. तीन दिवस 35 अंश सेल्सिअसवर असलेला पारा खाली उतरण्याची लक्षणे नाहीत. वातावरणातील ही स्थिती आणखी किमान दोन दिवस राहील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. 48 तास मुंबईतील ढगाळ वातावरण कायम राहील.

वर्दाह वादळाचा प्रभाव कोकण वगळता राज्यभरातून आता काढता पाय घेत आहे. विदर्भ वगळता कोकण व मध्य महाराष्ट्रातील आकाश वादळाने सोबत आणलेल्या बाष्पाने व्यापून टाकले होते. परिणामी, नाशिक व नगर येथे सातत्याने कमी राहणाऱ्या किमान तापमानातही वाढ दिसून आली. गेल्या आठवड्यात नगरमध्ये 5 आणि नाशिकमध्ये 10 अंशाखाली तापमान सरकले होते. सोमवारनंतर दोन्ही ठिकाणी तापमानात वाढ झाली. गुरुवारी नाशिकमधील तापमान 15.4 अंश सेल्सिअसवर गेले. ही स्थिती हळूहळू पूर्वपदावर येईल. कोकणात मात्र आकाश कोरडे होण्यास थोडा अवधी असल्याची माहिती हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली. दोन दिवस तापमान किमान 23 आणि कमाल 33 अंश सेल्सिअस राहील, असा अंदाज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

Yoga Tips : उत्तम पचनक्षमतेसाठी योगा फायदेशीर, जेवण झाल्यावर करा ‘या’ योगासनांचा सराव

Samantha Ruth Prabhu: एकवेळेच्या जेवणाचीही होती भ्रांत अन् आज आहे कोट्यवधींची मालकीण; 'ऊ अंटावा' गर्ल समंथाचा सुपरस्टार होण्याचा प्रवास

SCROLL FOR NEXT