मुंबई

काय सांगता! लॉकडाऊनमुळे रेल्वे रुळावर पाणी साचलंच नाही? वाचा नक्की काय माहिती आली समोर

सकाळ वृत्तसेवा

मुंबई- गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत पावसानं धुमशान घातलं आहे. अशातच सोमवारीही मुंबई शहर आणि उपनगरांतील काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं होतं. मात्र दरवर्षीप्रमाणे रेल्वे रुळावर पाणी तुंबल्याच्या घटनांमध्ये घट झाल्याचं पाहायला मिळालं. लॉकडाऊन दरम्यान घेण्यात आलेल्या देखभाल दुरुस्तीमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत रुळांवर कमी साचण्यास मदत झाली असल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितलं.

रविवारी, पश्चिम रेल्वे (WR)मध्य रेल्वे (CR)पेक्षा चांगली ठरली. मशिद, कुर्ला, ठाणे, मानखुर्द आणि वडाळा येथे रेल्वे रुळावर पाणी साचलं होतं. लॉकडाऊनच्या काळात रेल्वे अधिकाऱ्यांनी रेल्वेमार्गाच्या खाली 1,800 मिमी-रुंद असे पाईप बसवले. या पाईपमुळे रुळावर साचलेल्या पाण्याचा निचरा काढून टाकण्यासाठी या पाईपची मदत होणार आहे. या पाईपची संख्याही रेल्वेनं वाढवली आहे. 

पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं, दरवर्षी पावसाचं पाणी रेल्वे रुळावर साचतं. पावसाळ्यात पाण्याची साठवण असणाऱ्या चार ठिकाणी हे पाणी वाहतं. त्यात नव्यानं बांधलेली 1800 मिमी रुंद ड्रेनेज पाईप्समधून हे पाणी जातं. हे पाणी वसई रेल्वे यार्ड, नालासोपारा-विरार, नालासोपारा-वसई आणि गोरेगाव-मालाड या चार समस्याग्रस्त ठिकाणी जात असतं.  

अंधेरी, वांद्रे, माहीम, बोरिवली, गोरेगाव आणि प्रभादेवी या भागातील नालेसफाई करण्यात आली. या लॉकडाऊन दरम्यान आम्ही 15 कि.मी. लांबीचे नवीन नाले खोदले आणि या लॉकडाऊन दरम्यान 10 ठिकाणी 150-250 मि.मी. 30 किमी अंतरापर्यंत ट्रॅक वाढवले, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यानं दिली. कामगारांनी पावसाचं पाणी बाहेर काढण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या 144 मजबूत नेटवर्कमध्ये आणखी 58 पंप जोडले.

पश्चिम रेल्वेमार्ग मध्य रेल्वेच्या तुलनेत जास्त आहेत. तसंच मध्य रेल्वेवर पाणी साचण्याच्या घटनाही अधिक होत असतात. कुर्ला आणि टिळक नगर या रेल्वे स्टेशनवर (यावर्षी) पाण्याचा निचरा खूप वेगानं कमी झाला.  आम्ही टिळक नगरजवळ नवीन 1,800 मिमी रुंद पाईप आणि एक बॉक्स ड्रेनचा बसवला असल्याची माहिती, मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यानं दिली.

यावर्षी पंपांची एकूण संख्या 55 पर्यंत वाढवण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सुमारे 148 पाण्याचा निचरा करणारे पंप बसवलेत. आम्ही कोणत्याही आव्हानासाठी तयार आहोत. आम्ही नालेसफाईचं कामंही हाती घेतलं आहे. झाडे तोडणे, घाण दूर करणे अशी कामंही सुरु असल्याचं, मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT