Maratha-Kranti-Morcha
Maratha-Kranti-Morcha 
मुंबई

मराठा क्रांती मोर्चा निवडणूक रिंगणात!

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - मराठा समाजावर आजपर्यंत राज्यातील सत्ताधाऱ्यांनी अन्यायच केला आहे, असा आरोप करत मराठा क्रांती मोर्चाने लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. सरकारच्या निवडणुकीच्या कालावधीत तीन कोटी पत्रके वाटू, अशी घोषणाही मोर्चाचे कार्यकर्ते विनोद पोखरकर, संतोष सूर्यराव, अनिल शिंदे यांनी शनिवारी केली. 

कमळावर बहिष्कार हीच आमची भूमिका आहे. आगामी भाजपसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही मराठा समाजावर अन्यायच केला आहे, असा आरोपही या वेळी कार्यकर्त्यांनी केला. कोपर्डी खटल्यातील आरोपींना फाशीची शिक्षा, ॲट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कायद्यात बदल, कर्जमाफी, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी अशा विविध मागण्यांसाठी राज्यातील मराठा समाज रस्त्यावर उतरला होता. यातील आरक्षणाची मागणी वगळता अन्य मागण्यांची पूर्तता झालेली नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळाले असले, तरी हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी मागण्या मान्य केल्या नाही, तर निवडणुकीत कमळावर बहिष्कार टाकू, असा इशारा काही संघटनांनी दिला होता. या पार्श्‍वभूमीवर ते बोलत होते.

मोर्चे काढून काहीही साध्य होणार नाही, दबाव आणणे हीच आमची मुख्य भूमिका असून, प्रत्येक स्तरावर आमची फसवणूक करण्यात आली, अशी टीका या वेळी करण्यात आली. ‘कमळाने फसवले’, अशी सुमारे तीन कोटी पत्रके छापून त्याचे वाटप केले जाईल, अशी माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

DC vs MI, IPL: लाईव्ह सामन्यात पंतला आवरेना रोहितने हाती दिलेला पतंग उडवण्याचा मोह, Video Viral

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

SCROLL FOR NEXT