Ashok Chavan-Maratha-Reservation
Ashok Chavan-Maratha-Reservation E-Sakal
मुंबई

मराठा आरक्षणाचा लढा संपलेला नाही- अशोक चव्हाण

विराज भागवत

मागासवर्गीय आयोगामार्फत केंद्राकडे मागणी करणार असल्याची दिली माहिती

मुंबई: मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) बुधवारी अंतिम सुनावणी झाली. राज्य सरकारने दिलेले मराठा आरक्षण (Maratha reservation) सर्वोच्च न्यायालयाने 'असंवैधानिक' ठरवत रद्द केले. पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने हा निर्णय दिला. या निर्णयानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्यानंतर राज्यातर्फे मराठा आरक्षण विषयक मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्र सरकारची बाजू मांडली. तरीदेखील ठाकरे सरकारवर टीका सुरूच होती. त्यामुळे गुरूवारी अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेत काही मुद्द्यांवर भाष्य केलं. (Maratha Reservation

"न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केलं ही गोष्ट वेदनादायी आहे. पण त्या निर्णयाचा आधार घेत मराठा समाजाला चिथावणी देण्याचे काम केले जात असल्याची माहिती येत आहे. अशा चिथावणीला मराठा समाजाने बळी पडू नका. फडणवीस यांच्या बद्दल आम्हाला आदर आहे. त्यांना आमची विनंती आहे की जे कोणी मराठा समाजातील बांधवांना चिथावण्याचे काम करत असतील, त्यांना फडणवीस यांनी समजवावे.आणि मराठा समाजाला माझं हेच सांगणं आहे की, मराठा आरक्षणाचा आपला लढा संपलेला नाही", अशा शब्दात त्यांनी परखड मत व्यक्त केलं.

"पश्चिम बंगाल येथे जो हिंसाचार घडला, त्यावर कोर्टाने ताशेरे ओढले आहेत. मराठा आरक्षणाबाबत दिशाभूल करण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी आधीच्या सरकारने केंद्राकडे करायला हवी होती. मराठा आरक्षणाचे राजकारण करायचे नाही. राजकीय फायद्यासाठी कोणीही चुकीची विधाने करू नयेत. मागासवर्गीय आयोगाच्यामार्फत आम्ही केंद्राकडे मागणी करणार आहोत", अशी माहितीदेखील त्यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

मोठी बातमी! बारावीचा 25 मे तर दहावीचा निकाल 5 जूनपूर्वी; विद्यार्थ्यांची जुलैमध्ये पुरवणी परीक्षा; बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात असा होईल बदल

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज सभा! विमानतळ ते होम मैदान अन्‌ शहरातील ‘हे' दोन मार्ग राहणार बंद; सभेसाठी कसे यायचे, वाहने कोठे लावायची? वाचा सविस्तर

Sakal Podcast : लातुरात कोण बाजी मारणार? ते चित्रपट निवडीबाबत मृणाल ठाकूरचा मोठा खुलासा

Nashik Fire Accident : ‘इलेक्ट्रिकल ऑडिट’कडे दूर्लक्षामुळे आगीला मिळते निमंत्रण; भीषण आगीत कोट्यवधींची मालमत्तेची राख

SCROLL FOR NEXT