Mumbai
Mumbai Sakal
मुंबई

पाणी शुल्कवाढीमुळे माथेरानकर मेटाकुटीला

सकाळ वृत्तसेवा

माथेरान : थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानचे महागाई आणि कोरोनामुळे कंबरडे मोडले असतानाच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पाणी शुल्कात वाढ करून येथील पर्यटन व्यवसायाचे मोठे नुकसान केले आहे. यामुळे नागरिक आणि व्यावसायिकांत संताप आहे. कोरोनामुळे बंद असलेला माथेरान येथील पर्यटन व्यवसाय तीन महिन्यांपासून सुरू झाला आहे, परंतु जीवन प्राधिकरणाने पाणी शुल्कवाढ करून येथील स्थानिक आणि व्यावसायिकांच्या तोंडचे पाणी पळवले.याबाबत स्थानिक रहिवासी प्रकाश सुतार यांनी सांगितले, की पाणी हेच जीवन असे म्हटले जाते, पण माथेरानमध्ये याविरुद्ध सर्व होत आहे. दीड वर्ष कोरोनामध्ये वाया गेली. अनेकांचा रोजगार गेला. आता पाणी शुल्कवाढ करून जगणेच कठीण केले.

याबाबत जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता व्ही. के. सूर्यवंशी यांनी सांगितले, की पाणी शुल्कवाढ दर तीन वर्षांनी केली जाते. आमचा अर्थ विभाग यावर काम करत असतो. तीन वर्षांतील नफा-तोटा याचा परिपूर्ण अभ्यास केल्यानंतर माथेरानमध्ये ही वाढ केली जाते. माथेरान अभय योजना लागू झाली तर देयकात कपात होण्यासाठी विचार होऊ शकतो. त्यानंतरच नागरिकांना दिलासा मिळेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT