मुंबई

मेट्रो शहरांचा प्रवास जलद 

संतोष मोरे

मुंबई - स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त देशातील चार प्रमुख शहरे हायस्पीड ट्रेनने जोडण्यात येणार आहेत. ताशी 130 किलोमीटरने धावणाऱ्या या गाड्यांसाठी योजना आखण्याचे निर्देश रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अश्‍विन लोहानी यांनी रेल्वेच्या सर्व विभागांच्या महाव्यवस्थापकांना दिले आहेत. 

दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई या शहरांतून धावणाऱ्या गाड्यांचा वेग वाढवण्याचे पत्र लोहानी यांनी 21 मार्चला महाव्यवस्थापकांना दिले आहे. काही शहरांमध्ये लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी वेगमर्यादा आहे. ती मर्यादा हटवण्याची सूचना त्यांनी केली आहे. 13 एप्रिलपर्यंत सर्व झोनच्या महाव्यवस्थापकांना गाड्या वेग वाढवण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दिल्ली-आग्रा मार्गावर ताशी 160 किमी धावणाऱ्या सर्वात वेगवान गाडीचा लोहानी यांनी यावेळी उल्लेख केला. या गाडीचा वेग आग्रा ते झांशीदरम्यान ताशी 130 किलोमीटर असतो. यामुळे या मार्गावर वेग वाढवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. 

दिल्ली-कोलकाता व दिल्ली-मुंबई मार्गासाठी 18 हजार 500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या मार्गावरील रेल्वेतील जुने रूळ बदलून नवीन रूळ टाकणे, स्लीपर बदलणे, आधुनिक सिग्नल यंत्रणा, अधिक क्षमता असलेल्या विद्युत यंत्रणा कार्यान्वित करणे आदी कामे जलद हाती घेण्यात आली आहेत. रेल्वे मंत्रालयाने ही मोहीम वेगाने पूर्ण करण्यासाठी 2019 चे उद्दिष्ट ठेवले आहे. यामुळे गाड्यांचा वेग ताशी 160-200 किलोमीटर होऊ शकतो. 

तेजसचा वेगही वाढणार 
कोकण मार्गावर धावणाऱ्या तेजस एक्‍स्प्रेससह गतिमान एक्‍स्प्रेस, हमसफर एक्‍स्प्रेस, महामना या अत्याधुनिक गाड्यांचा वेग ताशी 130 किलोमीटर करण्यात येणार आहे. तसेच काही भागांत हा वेग ताशी 130 किलोमीटरपेक्षा अधिक असेल, तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

Karisma Kapoor : "करिश्माने माझा जीव वाचवला"; अभिनेता हरीशने सांगितली 'त्या' अपघाताची आठवण

Latest Marathi News Live Update: राज्य सहकारी बँकेकडून विठ्ठल कारखान्याचा साखर साठा ताब्यात घेण्याची नोटीस प्रसिद्ध

उन्हाळ्यात रसाळ फळ खाल्ल्यानंतर किती वेळानंतर पाणी प्यावे? वाचा एका क्लिकवर

DRDO Missile Test : समुद्राच्या सुरक्षेत भारताचं मोठं पाऊल; स्वदेशी पाणबुडी विरोधी मिसाईलची चाचणी यशस्वी! पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT