मुंबई

चहाच्या टपरीवर विकले जाते भेसळीचे दूध

सकाळवृत्तसेवा

मुंबई -  मुंबईत सध्या दुधात भेसळ करण्याचे प्रमाण वाढले आहे. अन्न व औषध प्रशासनाने 2017 मध्ये केलेल्या पाहणीत खार दांडा, अंधेरी पश्‍चिमेतील सुरेश नगर, जुहू गल्ली, दहिसर, मालाड मालवणी आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुधाच्या भेसळीचे अड्डे असल्याचे निष्पन्न झाले होते. तिथल्या झोपड्यांमध्ये दुधाच्या पिशव्यांमध्ये पाणी मिसळले जाते. काही ठिकाणी सुटे दूध नामांकित कंपन्यांच्या पिशव्यांमध्ये भरूनही विकले जाते. विशेष म्हणजे असे भेसळीचे दूध अनेकदा चहाच्या टपऱ्यांवर कमी दरात विकले जात असल्याचे स्पष्ट झाल्याने आपण मोठ्या चवीने पीत असलेला चहा त्रासदायक ठरू शकतो. 

मुंबईत रासायनिक भेसळीपेक्षा पाण्याची भेसळ अधिक प्रमाणात होते. एक लिटर दुधात पाणी टाकले जाते. त्यातून सव्वा ते दीड लिटर दुधाच्या पिशव्या बनवल्या जातात. मुंबईत प्रसिद्ध कंपन्यांच्या पिशव्यांमधील दूध इंजेक्‍शनच्या सीरिंजने काढून त्यात पाणी भरण्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. आता तर पॅकिंगची यंत्रे सहज उपलब्ध होत असल्यामुळे सुट्या दुधात पाण्याची भेसळ करून ब्रॅण्डेड कंपन्यांच्या पिशव्यांमध्ये भरून ते कमी दरात चहाच्या टपऱ्या आणि छोट्या हॉटेलमध्ये विकले जाते. त्यातून एका पिशवीमागे दोनपासून पाच रुपयांपर्यंत कमाई होते. अशा प्रकारे महिन्याला काही हजारोंचा फायदा कमवला जातो. 

दुधाच्या पिशवीत पाण्याची भेसळ करणाऱ्या सहा जणांना गुन्हे शाखा 11 च्या पोलिसांनी मालाडमधील क्वॉरी रोडमधून आठवड्याभरापूर्वी अटक केली होती. कृष्णा मल्लय्य अंबती, अंजना नरसिम्मा मुतियाला, शंकर रच्चामल्ला, सईदुल्ला अलिती, सुजत मुतियला आणि रामुल्लमा राचमल्ला अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी एका ब्रॅण्डेड कंपनीच्या दुधात भेसळ करत होते. त्यांच्याजवळून पोलिसांनी दुधाच्या 429 पिशव्या जप्त केल्या आहेत. मंगळवारी आणखी एका कारवाईत खारदांडाहून गुन्हे शाखेच्या कक्ष- 8 च्या पोलिसांनी व्यंकटेश गुंडाला, सविता कर्नाटकी, यादगिरी नागेली आणि अनंत रेड्डी यांना अटक केली. त्यांच्याकडून 430 लिटर भेसळयुक्त दूध, कंपनीचे प्रिंट असलेल्या रिकाम्या पिशव्या आणि भेसळीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. 

भेसळयुक्त दुधाचे दुष्परिणाम 
- 2017 मध्ये केलेल्या पाहणीत आवश्‍यक प्रमाणात फॅट्‌स आढळून आले नाहीत. 
- दुधात आवश्‍यकतेपेक्षा जास्त पाणी मिसळल्यास त्यातील फॅट्‌सचे प्रमाण कमी होते. अशा दुधातून आवश्‍यक पोषकतत्त्व मिळत नाहीत. 
- दूषित पाणी मिसळल्यास त्याचा मानवी आरोग्यावर घातक परिणाम होण्याची शक्‍यता असते. टायफॉईड, जुलाब-उलट्या, कावीळ, जंत, आतड्यांचे विकार, सिस्टोसोमियासिस, नारू आदी आजार होतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT