डोंबिवली : ज्यांची पोच नसते त्यांना या गोष्टी सुचत असतात. ज्यावेळी निवडणुका होतात, त्यावेळी नाक्यावर जाऊन सभा घेणारी लोक आहेत असा सणसणीत टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपा आमदार आशिष शेलार यांना लगावला आहे. कल्याण मध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. पुढे त्यांनी ज्यांच अस्तित्व मोदींवर आहे, त्यांना खाली कोण ओळखत. अशा लोकांना मी फार महत्त्व देत नाही असे ही म्हटले.
कर्नाटक मध्ये भाजपला पराभव स्वीकारावा लागला यावर बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अंबरनाथ येथे बोलताना भाजपावर टिका केली होती. राज म्हणाले, पराभव झाला आहे तो स्वभावाचा आणि वागणुकीचा झाला आहे असा आरोप त्यांनी भाजपावर केला होता. यावर भाजपा आमदार आशिष शेलार यांनी स्वप्नातल्या प्रतिक्रिया माणूस देऊ शकतो.
मै भी जिंदा हू हे दाखवण्यासाठी यांची प्रतिक्रिया आहे. त्यांच्या प्रतिक्रियेला आम्ही महत्त्व देत नाही. असा प्रतिटोला भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांना लगावला. शेलार यांच्या प्रतिक्रियेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर दिले आहे. ज्यांची पोच नसते त्यांना या गोष्टी सुचत असतात. ज्यावेळी निवडणुका होतात त्यावेळी नाक्यावर जाऊन सभा घेणारी लोक आहेत ही. काही गोष्टी विरोधकांच्या जरी असल्या तरी त्या मान्य करायला हव्यात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करू शकतात तर त्यांच्या पक्षातील लोकांना हे का मान्य नाही. भारत जोडो यात्रा किती ही झाकायचा प्रयत्न केला तरी त्याचा परिणाम झाला आणि तो कर्नाटक निवडणूक मध्ये दिसला. पराभवातून काही बोध घ्यायचाच नसेल तर असेच वागा असे ते म्हणाले. अस्तित्व टिकवण्यासाठी हे सगळे सुरू आहे. अशी टीका देखील अशी शेलार यांनी केली होती यावर उत्तर देताना राज म्हणाले, त्यांच अस्तित्व मोदींवर आहे, त्यांना खाली कोण ओळखत. अशा लोकांना मी फार महत्त्व देत नाही.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.