mumbai
mumbai 
मुंबई

क्लासेसमध्ये आग प्रतिबंधक यंत्रणा न बसवल्यास मनसेचा आंदोलनाचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

उल्हासनगर : मागच्या महिन्यात सुरतमध्ये एका खाजगी कोचिंग क्लासमध्ये अग्नितांडव झाले. त्यात 22 विद्यार्थी मृत्यूमुखी पडले होते. या घटनेची गंभीर दखल घेऊन येत्या पंधरवाडयात आग प्रतिबंधक यंत्रणा बसवली नाही तर, आंदोलनाचा खळ-खट्याक करणार असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने क्लासेस चालकांसोबत अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. विशेष म्हणजे मनवीसेने त्यासाठी प्रथम गुलाबाचे फूल देऊन गांधीगिरिच्या मार्गाने इशारा दिला आहे.मनवीसेचे शहराध्यक्ष मनोज शेलार यांनी ही माहिती दिली.

उल्हासनगरात महाविद्याये,कनिष्ठ महाविद्यालया सोबत इंग्रजी माध्यमांच्या असंख्य शाळा आहेत. स्पर्धात्मक युगात टॉपमध्ये येण्यासाठी विद्यार्थी अमाप फीस मोजून खाजगी कोचिंग मध्ये जातात. असे 125 ते 130 क्लासेस शहरामध्ये आहेत. सुरतची विदारक घटना घडल्यावर मनसेने या क्लासेसची पाहणी केली असता, कुठेही आग प्रतिबंधक यंत्रणा तर नाहीच. याशिवाय क्लासेसच्या जिन्या खाली विजेच्या वायरी लटकत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात-संकटात असल्याचा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला आहे.

हा प्रकार गांभिर्याने घेऊन स्थानिक वरिष्ठ पदाधिकारी बंडू देशमुख, प्रदिप गोडसे, संजय घुगे यांच्यासोबत क्लासेस चालकांना तसेच अग्निशमन अधिकारी यांना प्रथम गुलाबाचे फूल देऊन गांधीगिरिच्या मार्गाने निवेदन देण्यात आले आहे. त्यात पंधरवाडयात आग प्रतिबंधक यंत्रणा बसवली नाही तर, मनसेच्या शैलीत खळ-खट्याक करण्यात येणार असा इशारा देण्यात आल्याचे मनोज शेलार यांनी सांगितले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...बारामती मतदारसंघात नेमकं काय घडलं?

Session Court : लैंगिक छळ प्रकरणात माजी पंतप्रधान आणि माजी मुख्यमंत्र्यांचे नाव वापरण्यास बंदी; न्यायालयाचा आदेश जारी

Rohit Sharma : 6,8,4,11 आणि 4... वर्ल्ड कपच्या तोंडावर रोहितला झालं तरी काय? BCCI अन् चाहते टेन्शनमध्ये

Lok Sabha Voting 3rd Phase : महाराष्ट्रात सकाळी नऊ वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान; पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद

SCROLL FOR NEXT