मुंबई

'मुंबईवर प्रेम करणारे अधिकारी नेमा'; मेट्रो कारशेडवरून आदित्य ठाकरेंचा भाजपला टोला

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : दोन दिवसांपूर्वीत पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या हस्ते मुंबईत मेट्रोच्या पुढच्या टप्यातील कामांचे भूमीपूजन झाले. त्या कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील मेट्रोच्या कामांवर समाधान व्यक्त केले. आज, शिवसेनेच्या युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील आरे कॉलनीतील मेट्रोच्या कारशेडला विरोध असल्याची भूमिका स्पष्ट केली आहे.

मुंबईतील आरे कॉलनीत मेट्रोचे नियोजित कारशेड होणार आहे. आरे कॉलनीतील वनसंपत्ती त्यामुळे नष्ट होणार आहे. मुळात आरे कॉलनी हे मुंबईचं फुफ्फुस मानलं जातं. कारशेडमुळे आरे कॉलनीतील वन संपत्ती आणि सूक्ष्म जीव नष्ट होणार आहेत. त्याचा मुंबईच्या प्रदूषणावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. परिणामी आरे कॉलनीत आर शेड उभारू नये, अशी मागणी मुंबईतील पर्यावरण प्रेमींनी केली आहे. यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही आंदोलन छेडले असून, राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी आंदोलनात भागही घेतला होता.

वन्य जीवांचेही नुकसान
आरे कॉलनीतील मेट्रो शेड विरोधात मनसेने भूमिका घेतल्यानंतर शिवसेना त्यावर काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. मेट्रोच्या पुढील टप्प्यांची पायाभरणी करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समुद्रातील प्रदूणषाचा मुद्दा उपस्थित केला होता. गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत समुद्रात प्लास्टिक मिसळणार नाही, याची ग्वाही द्या, असे आवाहन त्यांनी केले होते. पण, त्याचवेळी आरे कॉलनीतील संभाव्य वृक्षतोडीमुळे वाढणाऱ्या वायू प्रदूषणाचा मुद्दा मात्र दुर्लक्षित राहिला होता. आज युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन मेट्रो कारशेडबाबत भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘शिवसेनेचा मुंबईत मेट्रोला विरोध नाही. तर आरे कॉलनीतील नियोजित कार शेडला विरोध आहे.झाडे तोडली तर, केवळ झाडांचेच नव्हे तर वन्य जीवांचेही मोठे नुकसान होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबईवर प्रेम करणारे अधिकारी नेमावेत. आम्ही कन्सलटंट नाही पण, भाजपने नवा नेमावा आणि अश्विनी भिडे यांची बदली करावी.’ या वेळी पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांनी आरे कॉलनीतील वनसंपत्ती आणि प्राण्यांचा अधिवास, याची सविस्तर माहितीही दिली. आदित्य ठाकरेंचे हे वक्तव्य म्हणजे, जागा वाटपापूर्वी शिवसेनेने भाजपला लगावलेला टोला आहे.

गडकरी म्हणतात, 'अपरिहार्यता'
दरम्यान, केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी आरे कॉलनीतील वृक्षतोड अपरिहार्य असल्याचे म्हटले आहे. केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या दोन पक्षांकडून वेगवेगळी भूमिका मांडण्यात येत असल्यामुळे आश्चर्य होत आहे. राज्यातील वृक्षलागवड मोहिमेचे जगभरात कौतुक होत आहे. आरे कॉलनीतील वृक्षतोड झाली तर, त्याची भरपाई करण्याचे धोरण स्वीकरले जाईल, अशी भूमिकाही गडकरी यांनी मांडली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harsh Goenka: हर्षद मेहता युग परत आले? शेअरच्या किमतीत होतेय फेरफार; हर्ष गोयंका यांची अर्थ मंत्रालयाकडे तक्रार

KKR IPL 2024 : KKR जिंकणार यंदाची IPL ची ट्रॉफी? जसं 2012 मध्ये झालं तसंच 2024 मध्ये होतय....

CBSE Board : दहावीमध्ये मुलभूत गणित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ११ वीमध्ये स्टॅंडर्ड मॅथ्स हा विषय घेता येणार

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT