मुंबई

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीनंतर सावध राहा

सकाळवृत्तसेवा

मुंबई - राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीनंतर भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेनेला अडचणीत आणण्याची एकही संधी सोडणार नाही, त्यामुळे या निवडणुकीनंतर सावध राहा, असा सल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी पक्षाच्या आमदारांना दिला. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर आक्रमक राहण्याचा सल्लाही त्यांनी या वेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिला.

शिवसेना भवनमध्ये झालेल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ठाकरे बोलत होते. या बैठकीत त्यांनी राज्यातील विविध समस्यांचाही आढावा घेतला. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीनंतर महापालिकांमध्ये गाफील राहू नका. भाजपला मुद्द्यांवरून उत्तर द्या, असा सल्ला त्यांनी या वेळी पदाधिकाऱ्यांना दिल्याचे समजते.

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत आपला उमेदवार निवडून येण्यासाठी भाजपला शिवसेनेचा पाठिंबा आवश्‍यक आहे, त्यामुळे भाजप सध्या शिवसेनेला आक्रमक होऊन प्रत्युत्तर देत नाही; मात्र या निवडणुकीनंतर भाजप राज्यात आणि महापालिकांमध्ये शिवसेनेला अडचणीत आणू शकतो, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT