मुंबई

रानसई धरण ओव्हरफ्लो

सकाळवृत्तसेवा

उरण - रानसई धरण क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून कोसळणाऱ्या जोरदार पावसामुळे धरण ओसंडून वाहू लागले आहे. त्यामुळे उरण तालुक्‍यातील पिण्याच्या पाण्याचे संकट दूर झाले आहे. आतापर्यंत धरण क्षेत्रात जवळजवळ ८०० मिलीमीटर पाऊस झाला. सध्या या धरणाची पाण्याची पातळी ११६.५ फुटांच्या वरती असल्याची माहिती एमआयडीसीचे उपअभियंता आर. डी. बिरंजे यांनी दिली.

रानसई धरणाची उंची १२० फूट जरी असली तरी धरणाची पाण्याची पातळी ११६.५ फूट एवढी झाली, की हे धरण ओसंडून वाहू लागते. अर्ध्याअधिक उरण तालुक्‍याची तहान रानसई धरण भागवते. रानसई धरणातून सध्या उरण नगरपालिका, २१ गावे आणि एनएडी, ओएनजीसी, जीटीपीएस या प्रकल्पांना पाणीपुरवठा केला जातो. या धरणाची पाणी साठवणुकीची क्षमता १० एमसीएम एवढी आहे. यंदा जून महिन्यात या धरणाच्या पाण्याने तळ गाठला होता. त्यामुळे एमआयडीसीने धरणाच्या मृतसाठ्यातून पाणीपुरवठा सुरू केला होता. त्यामुळे तालुक्‍यात दोन दिवस पाणी कपात करण्यात येत होती. आता धरण भरले असल्यामुळे उरणची पाणी कपात कमी करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

SEBI Notice: अदानींना मोठा धक्का! समूहाच्या सहा कंपन्यांना सेबीकडून कारणे दाखवा नोटीस; काय आहे कारण?

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : आज कपिल पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार

SCROLL FOR NEXT