मुंबई

जीवघेणा खांब रेल्वेने हटवला

सकाळवृत्तसेवा

विरार - नालासोपारा आणि वसई स्थानकांदरम्यान रेल्वेमार्गालगतचा जीवघेणा खांब अखेर प्रशासनाने हटवला. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

नालासोपारा आणि वसई स्थानकांदरम्यान रेल्वेने ओव्हरहेड वायरसाठी एक खांब उभारला होता. रुळांच्या अगदी लगत असलेल्या या खांबावर आदळल्याने वर्षभरात आठ प्रवाशांचा बळी गेला आणि अनेक जण जखमी झाले. हा जीवघेणा खांब हटवण्याची मागणी प्रवाशांनी केली होती. त्याबाबत युवासेनेचे प्रतीक सुतार आणि रविकांत नागरे यांनी रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याकडे तक्रार केली होती. हा खांब रेल्वे प्रशासनाने हटवून रुळांपासून सुरक्षित अंतरावर दुसरा खांब उभारला आहे. 

या स्थानकांतून दररोज हजारो नागरिक प्रवास करतात. त्यामुळे लोकलमध्ये प्रचंड गर्दी होत असल्याने अनेक प्रवाशांना दरवाजात उभे राहावे लागते. या प्रवासात लोकलच्या दारात उभे राहिलेले अनेक प्रवासी त्या खांबावर आदळून खाली पडले होते. रात्रीच्या वेळी अशा अपघातांचे प्रमाण जास्त होते. गेल्याच महिन्यात दोन दिवसांत दोन अपघात झाले होते. हा खांब रेल्वे प्रशासनाने हटवल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...बारामती मतदारसंघात नेमकं काय घडलं?

Session Court : लैंगिक छळ प्रकरणात माजी पंतप्रधान आणि माजी मुख्यमंत्र्यांचे नाव वापरण्यास बंदी; न्यायालयाचा आदेश जारी

Rohit Sharma : 6,8,4,11 आणि 4... वर्ल्ड कपच्या तोंडावर रोहितला झालं तरी काय? BCCI अन् चाहते टेन्शनमध्ये

Lok Sabha Voting 3rd Phase : महाराष्ट्रात सकाळी नऊ वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान; पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद

SCROLL FOR NEXT