driving
driving 
मुंबई

आता मिळणार कोणत्याही आरटीओतून वाहन परवाना

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २२ ः यापूर्वी रहिवासी पत्ता असलेल्या प्रादेशिक परिवहन कार्यालयातून (आरटीओ) वाहन परवाना काढता येत होता. परंतु, आता सुधारित कायद्यांतर्गत हा नियम बदलण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या नवीन मोटार वाहनदुरुस्ती कायद्यातील तरतदीनुसार राज्यातील कुठल्याही ‘आरटीओ’मधून वाहन परवाना काढणे व नूतनीकरण करता येणार आहे.

केंद्र सरकारने १९८८ च्या मोटार वाहन कायद्यात दुरुस्ती करून, सुधारित कायदा तयार केला आहे. १ सप्टेंबरपासून राज्यात तो लागू करण्यात आला आहे. या संदर्भात राज्याच्या परिवहन विभागाने सर्व प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना या कायद्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.नव्या मोटर वाहन कायद्यानुसार परिवहन सेवेत अनेक बदल करण्यात आले आहेत.

विशेषतः वाहन परवाना काढणे, नव्या वाहनांची नोंद करणे यामध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. आजवर परवाना काढण्यासाठी संबंधित कार्यालयाअंतर्गत जिल्ह्यातील रहिवाशाच्या पत्त्याची गरज अनिवार्य होती. त्यामुळे दुसऱ्या जिल्ह्यात शिक्षण, नोकरीसाठी आलेल्या नागरिकांना परवाना मिळवण्यात अडचणी येत होत्या. मात्र, आता ही अट रद्द करण्यात आल्याने नोकरदार आणि विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. 

ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा
आतापर्यंत आरटीओतील कामांसाठी नागरिकांना दलालाची मदत घ्यावी लागत होती. मात्र, आता parivahan.gov.in या संकेतस्थळावर वाहनाशी संबंधित सर्व सेवांसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT