भिवंडी : शहरातील आनंद दिघे चौकात रास्तारोको आंदोलन करताना रिक्षाचालक.
भिवंडी : शहरातील आनंद दिघे चौकात रास्तारोको आंदोलन करताना रिक्षाचालक. 
मुंबई

भिवंडी, कल्याणमध्ये 'एनआरसी'ला विरोधात 

सकाळ वृत्तसेवा

भिवंडी : केंद्र सरकारने देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायदा (एनआरसी) लागू केला आहे. सदरचा कायदा संविधानाच्या कलम 14 चे उल्लंघन करणारा आहे, असा आरोप भिवंडी तालुका रिक्षा चालक मालक महासंघाने करत या कायद्याचा विरोधात सोमवारी रिक्षा-चालक महासंघाच्यावतीने रिक्षा बंद आंदोलन करण्यात आले.

त्यामुळे सकाळी शालेय विद्यार्थी, कामगार व नोकरदार वर्गाचे चांगलेच हाल झाले. ही बाब काही रिक्षा संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना न पटल्याने त्यांनी आपल्या रिक्षा रस्त्यावर उतरवून प्रवाशांना दिलासा दिला. दरम्यान दुपारी 3 वा. शहरातील आनंद दिघे चौकात काही वेळ रास्ता रोको आंदोलन करून भिवंडी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा नेऊन सरकारला निवेदन देण्यात आले.
 
केंद्र सरकारने नागरिकांना विश्वासात न घेता नागरिकत्व दुरुस्ती कायदा संमत केला आहे. या कायद्यामुळे मुस्लिम समाजात संतापाची लाट उसळली आहे. आज भिवंडीत तालुका रिक्षा चालक-मालक महासंघाच्यावतीने आनंद दिघे चौकात रास्तारोको आंदोलन करून मोर्चा काढण्यात आला. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत हा कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली. नोटाबंदी, जीएसटीमुळे आर्थिक परिस्थिती डबघाईस आली आहे.

सरकारने विकासात्मक धोरण राबवण्याऐवजी धार्मिक तुष्टीकरण करून जनतेला वेठीस धरले आहे. याचा निषेध करण्यासाठी आज रिक्षा बंद आंदोलन केल्याचे सांगण्यात आले. यावेळी रिक्षाचालकांच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन प्रांत अधिकारी डॉ. मोहन नळदकर यांना दिले. यावेळी रिक्षा संघटनांचे पदाधिकारी अस्लम काबाडी, अय्युब शेख, अख्तर शेख, अनंता गुळवी, खालिद इरफान, इद्रीस शेख, युवराज शिखरे, मनोज कोंडलेकर, अलीहुसेन ठाकरे, मदार खान, मेहबूब अन्सारी आदींसह रिक्षा चालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  

कल्याणमध्ये एनआरसीविरोधात मोर्चा 
कल्याण : राष्ट्रीय कॉंग्रेस पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पार्टी (सीपीआय), राष्ट्रसेवा दल, समता संघर्ष, तसेच शिक्षण, आरोग्य अधिकार मंच यांनी एकत्रितपणे आज नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला (एनआरसी) विरोध करत मोर्चा काढला. दुर्गाडी किल्ल्याजवळील ऊर्दू हायस्कूलजवळून निघालेल्या या मोर्चामध्ये पाच ते सहा हजार नागरिक सहभागी झाले होते. यात प्रामुख्याने मुस्लिम समाजातील नागरिकांचा समावेश होता. नव्याने येऊ घातलेल्या कायद्याला विरोध करत नागरिकांनी लोकशाही पद्धतीने या मोर्चामध्ये आपला सहभाग नोंदवला. 

बदलापुरात एनआरसीच्या समर्थनार्थ रॅली 
बदलापूर : नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (एनआरसी) समर्थनार्थ बदलापूरमध्ये रविवारी (ता. 22) सायंकाळी राष्ट्रीय मतदाता मंचातर्फे समर्थन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. बदलापूर पूर्व भागात रेल्वे स्थानकापासून सुरू झालेल्या रॅलीचा समारोप महात्मा गांधी चौकात झाला. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ रॅलीमध्ये घोषणा देण्यात आल्या. रॅलीमध्ये पंडितराव माळी, रामभाऊ शेटे, सौरभ जोशी, प्रसाद दीक्षित, प्रशांत कुलकर्णी, अविनाश खिलारे यांच्यासह महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नागरिकत्व कायद्यासंदर्भात विरोधाभासाचे वातावरण निर्माण करून देशभर तणाव निर्माण करण्याचे सुरू असलेले प्रयत्न हाणून पाडावेत, अफवांवर विश्‍वास ठेवू नका, असे आवाहन रॅलीतर्फे नागरिकांना करण्यात आले. 
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT