मुंबई

दहावीचे निकाल घसरल्याने मंडळाकडे विक्रमी अर्ज 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : दहावीचा निकाल घसरल्याने राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या मुंबई विभागीय कार्यालयाकडे गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रतीसाठी यंदा विक्रमी अर्ज दाखल झाले आहेत. तब्बल चार हजार विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे अर्ज दाखल केल्याने पालकांच्या खिशाला लाखोंचा भुर्दंड पडत आहे; मात्र दुसरीकडे मंडळाच्या तिजोरीत घसघशीत रक्कम जमा होत आहे.

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल यंदा तब्बल 12 टक्‍क्‍यांनी घसरला. यंदा विद्यार्थ्यांना देण्यात येणारे अंतर्गत गुण बंद केल्याने निकालाची टक्केवारी घसरली. दहावीत चांगले गुण मिळणे अपेक्षित असताना कमी गुणांमुळे अकरावी; तसेच अन्य प्रवेशप्रक्रिया विद्यार्थ्यांसाठी जिकिरीची झाली आहे. त्यामुळे पालकांनी गुणपडताळणी, उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत; तसेच पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्यास सुरवात केली आहे.

अर्ज दाखल करण्यास 29 जून ही शेवटची तारीख असून, आजपर्यंत मंडळाकडे चार हजार अर्ज आले आहेत. 
दरवर्षी मंडळाकडे गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांची छायांकित प्रत, पुनर्मूल्यांकनासाठी दोन ते अडीच हजारांपर्यंत अर्ज येतात; परंतु यंदा अर्जांची संख्या दुप्पट झाली आहे.

मंडळाकडून गुणपडताळणीसाठी 50 रुपये, उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतीसाठी 400 आणि पुनर्मूल्यांकनासाठी 300 रुपये आकारण्यात येत आहेत. विशेष म्हणजे पुनर्मूल्यांकन करायचे असल्यास विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांची छायांकित प्रत घेणे आवश्‍यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रतिविषय तब्बल 700 रुपये मोजावे लागत आहेत.

आतापर्यंत चार हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले असून, यामध्ये पुनर्मूल्यांकनाच्या अर्जांची संख्या अधिक आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांना जवळपास 25 लाख रुपये मोजावे लागले आहेत. अर्ज भरण्याची मुदत आणखी दोन आठवडे असल्याने अर्जांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्‍यता आहे. 

राज्यात अनुत्तीर्ण झालेल्या तीन लाख 90 हजार विद्यार्थ्यांपैकी सुमारे 60 टक्के विद्यार्थी पुनर्मूल्यांकन आणि गुणपडताळणीसाठी अर्ज करतात. शहरी विद्यार्थ्यांच्या तुलनेत ग्रामीण विद्यार्थी अर्जासाठी पैसे देऊ शकत नाहीत. निकालाच्या गोंधळाचा भुर्दंड पालकांवर टाकण्याऐवजी सरकारने यासाठी विशेष अनुदान दिले पाहिजे. 

- उदय नरे, माजी सदस्य, मुंबई विभागीय मंडळ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT