मुंबई, ता.25: राज्यात विरोधी पक्ष शिल्लक राहणार नाही अशा वल्गना करणार्या भाजपच्या सत्तेचा अंहकार राज्यातील जनतेनं उतरवल्याची टीका करत महाआघाडीकडे 117 आमदारांचे बळ असल्याची माहिती काॅग्रेस व राष्ट्रवादीने दिली.
काॅग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्वतंत्र पत्रकार परिषद घेत भाजप व शिवसेनेवर हल्ला चढवला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षात राज्यातील जनतेला केवळ दिवास्वप्न दाखवली. खोटे बोलून जनतेची दिशाभूल केली. अशी टीका करत जनतेनं युती सरकारच्या विरोधात राग वक्त केल्याचे नवाब मलिक म्हणाले. तर, काॅग्रेसमुक्त महाराष्ट्र करू अशी अवहेलना करणार्या भाजपला जनतेनं मतपेटीतून चपराक लगावल्याचे बाळासाहेब थोरात म्हणाले.
दरम्यान काॅग्रेस-राष्ट्रवादी व सर्व मित्रपक्षांच्या आघाडीला 117 जागांवर विजय मिळाला आहे. राष्ट्रवादीचे 39 उमेदवार दुसर्या क्रमांकावर असून काही उमेदवार हजार मतांच्या फरकानं पराभूत झाले. याचाच अर्थ राज्यात शरद पवार व राष्ट्रवादीची लाट होती. असा दावा मलिक यांनी यावेळी केला.
WebTitle : oppositions has power of 117 MLS says congress and NCP leaders
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.