पावभाजी, सलाडच्या ताटातून कांदा, टोमॅटो गायब
पावभाजी, सलाडच्या ताटातून कांदा, टोमॅटो गायब 
मुंबई

पावभाजी, सलाडच्या ताटातून कांदा, टोमॅटो गायब

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : पदार्थांची लज्जत वाढवणाऱ्या कांदा आणि टोमॅटोचे दर वाढल्याने गृहिणींबरोबरच खानावळ, उपाहारगृह, छोट्या हॉटेलचालकांना या वस्तूंचा वापर काटकसरीने करावा लागत आहे. त्यामुळे पावभाजी आणि सलाडच्या ताटामधून कांदा, टोमॅटो गायब झाल्याचे पाहायला मिळत आहे. 

कांदा ६० ते ७० रुपये किलो, तर टोमॅटोच्या किमती ६० रुपये किलोवर जाऊन पोहचल्या आहेत. या दोन्हीचा वापर बहुतांश सर्वच भाज्यांमध्ये केला जातो. एरव्ही चार जणांच्या भाजीसाठी एक कांदा, अर्धा टोमॅटो वापरला जात असे. तिथे आता अर्धा कांदा आणि पाव टोमॅटोचा वापर करावा लागत आहे. घरचे भाजीसाठीचे बजेट सांभाळताना गृहिणींना कांदा, टोमॅटोबरोबरच कोथिंबिरीचा वापरही जपून करावा लागत आहे. गावठी कोथिंबीर एक जुडी ५० ते ६० रुपयाने किरकोळ बाजारात उपलब्ध आहे. खानावळ, उपाहारगृह, हॉटेलचालकांनाही महागाईचा मोठा फटका बसला आहे. पदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या जिन्नसांमध्ये काटकसर करायची; तर चवीत फरक पडतो. हा फरक ग्राहकांना नाराज करणारा ठरत असल्याने, पदार्थांचे दर वाढू न देता शक्‍य तिथे वापर कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पाणीपुरी, चाट विक्रेते यांनीही कांदा, टोमॅटोचा वापर कमी केला आहे. शेवपुरी, दाबेली, पाव भाजीसोबत आता जास्तीचा कांदा दिला जात नसून, सलाडमध्येही केवळ काकडी, गाजर, बीटचा वापर वाढला आहे. कोशिंबिरीत केवळ काकडी किंवा कांद्याऐवजी कोबीचा वापर केला जात आहे.

कांदा, टोमॅटोचेच नाही तर प्रत्येक भाजी, डाळी यांचेही दर वाढले आहेत. महागाईमुळे हॉटेल चालवणे कठीण झाले आहे. पदार्थांमध्ये एखादा जिन्नस कमी वापरला तर त्याचा चवीवर परिणाम होतो. त्यामुळे नुकसान सहन करावे लागत आहे. 
- कृष्णा पुजारी, हॉटेलचालक.

कांदे पोहे, उपिटवर टाकण्यास कोथिंबीर, कांदा देत होतो; ते आता बंद केले. कांदा पोह्यासाठी साडे तीन किलो पोह्यांमध्ये एक ते दीड किलो कांदा वापरायचे, तो आता पाऊण किलोच वापरते. पदार्थांचे दर वाढवल्यास ग्राहकांची संख्या कमी होईल, त्यामुळे हा पर्याय सोपा वाटला. 
- नाझिया बागवान, स्वाद स्नॅक्‍स सेंटर.

भाज्यांमध्ये कांदा, टोमॅटोचा वापर कमी केला आहे. मेन्यू कार्डमधून कांदा भजीचा पर्याय वगळला आहे. त्याऐवजी कोणी मागणी केलीच तर कोबीची भजी देतो. अतिरिक्त कांदा देणे बंद केले आहे. 
- शिवामा बागड, उपाहारगृह चालक, नेरुळ.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT