मुंबई

प्रसादात विषबाधा करण्याचा कट; एटीएसची दहाजणांविरोधात कारवाई

सकाळ वृत्तसेवा

मुंबई- वादग्रस्त मुस्लिम धर्मप्रचारक डॉ. झाकिर नाईकच्या प्रभावात येऊन अतिरेकी कारवाया केल्याचा आरोप असलेल्या दहाजणांविरोधात दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) विशेष न्यायालयात नुकतेच आरोपपत्र दाखल केले.

मुंब्रामधील मंदिराच्या प्रसादामध्ये विष मिसळून घातपात घडवून आणण्याचा कट आरोपींनी केला होता, असा आरोप एटीएसने ठेवला आहे. चालू वर्षी जानेवारीमध्ये एटीएसने ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा आणि औरंगाबादमधून उम्मत ए मोहम्मदीया या संघटनेच्या दहाजणांना अटक केली होती.

मुंब्रामधील एका टेकडीवर त्यांनी स्फोटके आणि विष तयार करण्याचे प्रशिक्षणही त्यांनी घेतले होते. आणि मुंब्रामधील ऐतिहासिक मुंब्रेश्‍वर मंदिराच्या महाप्रसादामध्ये घातक रसायने मिसळून घातपात करण्याचा कट आखला होता, असा एटीएसचा आरोप आहे.

दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटशी (आयएस) आरोपी संबंधित असून नाईकच्या चिथावणीखोर भाषणाच्या प्रभावात होते, नाईकचे अनेक छायाचित्रे आणि व्हिडिओ आरोपींच्या सोशल मिडियावर पोलिसांना सापडले आहेत. परदेशातील अतिरेक्‍यांच्या संपर्कात काही आरोपी होते, असे आरोपपत्रामध्ये म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT