मुंबई

अपहृत पाच मुलांची पोलिसांकडून सुटका

सकाळवृत्तसेवा

अहमदाबाद, कर्नाटक, गोव्यात विक्री
मुंबई - मुलांचे अपहरण करून त्यांची परराज्यात विक्री करणाऱ्या पाच महिलांसह आणखी एकास मानखुर्द पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्या चौकशीत मिळालेल्या माहितीद्वारे मानखुर्द पोलिसांनी पाच मुलांची सुटका केली. अहमदाबाद, कर्नाटक आणि गोव्यात या मुलांना संशयितांनी विकले होते. अपहृत मुले उल्हासनगर आणि कल्याण परिसरातील आहेत. महिला व बालविकास समितीसमोर हजर केल्यानंतर त्यांना पालकांच्या ताब्यात दिले जाईल.

मानखुर्द परिसरातील अहमद जफर कमाल खान याचे 5 डिसेंबरला अपहरण झाले होते. या प्रकरणी मानखुर्द पोलिसांत गुन्हा दाखल झाला. परिमंडळ 6 चे पोलिस उपायुक्त शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू होता. वरिष्ठ निरीक्षक नरेश कासले यांच्या पथकाने संशयित योगीता साळे हिला ताब्यात घेतल्यानंतर चौकशीत आशा ठाकूर, नूरजहॉं मुल्ला, प्रभावती नाईक, माला वानखेडे आणि गणेश साळे यांची नावे पुढे आली. पोलिसांनी त्यांनाही अटक केली. या सहाही जणांची पोलिसांनी कसून चौकशी केली. त्या वेळी सहा महिन्यांत पाच मुलांचे अपहरण करून अहमदाबाद, गोवा आणि कर्नाटक येथे विकल्याची कबुली त्यांनी दिली. मुलांची गरज असणाऱ्यांची माहिती नूरजहॉं काढायची. त्यानंतर माला आणि आशा झोपडपट्ट्यांतून मुलांचे अपहरण करत असत. त्यापूर्वी दोघी परिसराची टेहळणी करायच्या. दुपारी कोणी नसल्याचे पाहून त्या मुलांचे अपहरण करायच्या. नूरजहॉं अवघ्या अडीच ते तीन लाखांत मुलांची विक्री करायची. माला आणि आशा यांनी उल्हासनगर व कल्याणमधून पाच मुलांचे अपहरण केल्याची कबुली दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Sakal Podcast : बीड पंकजा मुंडेंना अवघड जाणार? ते ‘मर्द’ला पराभवाचा ‘दर्द’च होत नाही

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

SCROLL FOR NEXT