मुंबई

...म्हणून चिकनने खाल्ला पुन्हा भाव 

सकाळ वृत्तसेवा


अलिबाग ः चिकन खाण्याने कोरोना होतो, या अफवेमुळे संकटात सापडलेल्या रायगड जिल्ह्यातील पोल्ट्री व्यवसाय पुन्हा उभारी मिळत आहे लॉकडाऊनमुळे मासे, भाज्या पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत. दुसरीकडे पोट्री व्यवसायिकांकडून पुरेसा माल मिळत नसल्याने चिकनचे भाव वाढू लागले आहे. दीड महिन्यापुर्वी चिकनच्या एका किलोला 50 रुपयांचाही भाव मिळत नव्हता. आता तो 160 ते 180 रुपयांपर्यंत पोहचला आहे. 

महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण सापडू लागल्यानंतर समाज माध्यमांवर चिकनमधून हा आजार पसरतो, असे संदेश प्रसारीत झाले. त्यामुळे अनेकांनी त्याकडे पाठ फिरवली. ग्राहकांच्या मनातील ही भीती दूर करण्यासाठी पोल्ट्री व्यवसायिकांनी जनजागृतीही केली होती. परंतु यामध्ये त्यांना यश आले नाही. जिल्हा पशुवैद्यकीय विभाग, आरोग्य विभागाने पुढाकार  घेत चिकनमुळे कोणताही धोका नसल्याचे ग्राहकांना पटवून देण्याचा प्रयत्न केले होते. दीड महिन्यानंतर आता परिस्थिती बदलत आहे.

हे वाचा : उद्धव ठाकरेंना राज्यपालांचा फोन..

भाज्या आणि माशांचा कमी झालेल्या पुरवठ्यामुळे ग्राहक मोठ्या संख्येने पुन्हा चिकनच्या दुकानाकडे वळू लागले आहेत. परंतु आता त्याचा पुरवठा कमी होत असल्याने भाववाढ झाली आहे. अफवेमुळे दीड महिन्यात जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिकांचे साधारण 4 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे म्हणणे आहे. अनेक पोल्ट्री व्यावसायिकांनी नवीन पक्षीच आणले नाहीत. तर 50 टक्के पोल्ट्री व्यावसायिकांना व्यवसाय बंद ठेवला आहे. त्यामुळे काही दिवसांत आणखी भाववाढ होण्याची शक्‍यता आहे. 
 

चिकनमधून कोरोनाचा पसार होतो. या अफवेमुळे झालेले नुकसान भरुन निघणारे नाही. त्यामुळे लॉकडाऊनच्या दरम्यान अनेकांनी हा व्यवसाय पुन्हा सुरु करण्याचे धाडस दाखवत नाहीत. खाद्यान्न, पक्षाची वाहतुक होत नव्हती, यामुळे चिकनचा पुरवठा सुरळीत होण्यास आणखी काही काळ लागणार आहे. 
- दर्शन म्हात्रे, पोल्ट्री व्यावसायिक, ताडवागळे-अलिबाग 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Accident: कोल्हापुरातील रस्त्यावर घडला 'कॅरम बोर्ड'सारखा थरार! भरधाव कारनं दुचाकींना उडवलं, तिघांचा मृत्यू; व्हिडिओ व्हायरल

Market Cap: सेन्सेक्स ऐतिहासिक उच्चांकावर; बीएसई कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये 14 लाख कोटींची भर

Wayanad Lok Sabha Election Results: काँग्रेससाठी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या वायनाडमध्ये राहुल गांधींना धक्का?

"BJP ने आपल्याच समर्थकांना हिंसक बनवले," माजी मुख्यमंत्र्याच्या धक्कादायक आरोपांमुळे देशभरात खळबळ

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याबद्दल नागपूरच्या निशांत अग्रवालला जन्मठेपेची शिक्षा

SCROLL FOR NEXT