मुंबई

Ramdas Kadam: .. नाही तर तोंड फोडल्या शिवाय राहणार नाही; रामदास कदमांवर रविंद्र चव्हाणांचा प्रहार! मुंबई- गोवा महामार्गावरून युतीत खोडा ?

Shivsena Vs Bjp: युतीत आता कुस्ती पहायला मिळणार का अशी चर्चा होऊ लागली आहे.

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

Dombivali: प्रभू रामचंद्रांचा वनवास 14 वर्षांनी संपला; पण मुंबई- गोवा महामार्ग 14 वर्षांत झाला नाही. देवेंद्र फडणवीस यांनी चमकोगिरी करणाऱ्या कुचकामी रवींद्र चव्हाण यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यायला हवा असे म्हणत शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी भाजपचे मंत्री चव्हाण यांना घरचा आहेर दिला.

ही टीका मंत्री चव्हाण यांच्या जिव्हारी लागली असून त्यांनी युतीधर्म पाळतो याचा अर्थ असा नाही कोणी काही बोलेल. तोंड सांभाळून बोलायचं नाही तर तोंड फोडल्या शिवाय राहणार नाही असे म्हणत शिंदे गटावर निशाणा साधला. यामुळे युतीत आता कुस्ती पहायला मिळणार का अशी चर्चा होऊ लागली आहे.

ठाणे येथील राम गणेश गडकरी रंगायतन येथे शिवसेना शिंदे गटाचा मेळावा पार पडला. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत अनेक मुद्द्यांना हात घातला. यावेळी उद्धव ठाकरेंपासून ते भाजप नेत्यांपर्यंत अनेकांचा त्यांनी समाचार घेतला.त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सध्याच्या मुंबई-गोवा महामार्गावरून सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका केली.

प्रभू रामचंद्रांचा वनवास 14 वर्षांनी संपला; पण मुंबई- गोवा महामार्ग 14 वर्षांत झाला नाही. याचे दुःख वाटत आहे. नुसते पाहणी दौरे कशासाठी करायचे, त्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी चमकोगिरी करणाऱ्या कुचकामी रवींद्र चव्हाण यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यायला हवा, असे म्हणत महायुतीला 'घरचा आहेर' दिला.

त्यामुळे भाजप गोटात नाराजी व्यक्त होत आहे. शिंदे गटाच्या या टीकेला मंत्री रवींद्र चव्हाण यांनी खरंमरीत उत्तर दिले आहे, या संदर्भातला प्रश्न तो अडाणी माणूस आहे हे माझं मत...नॅशनल हायवे नितीन गडकरी साहेब यांच्या अंतर्गत येतो त्यामुळे हा अडाणी सारखा त्यांचे उत्तर आहे..रामदास कदम यांच्या बाजूला बसणारे व टाळ्या वाजवणारे त्याच पद्धतीचे असतील..मला त्यांच्यावर टीका करायला आवडत नाही मात्र त्यांच्या मुलाच्या मतदारसंघात रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार महायुती मधलं सरकारच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये दिले..त्यांच्या मुलाला हजारो कोटी रुपये निधी दिले त्यामुळे त्यांनी माझे आभार मानले पाहिजे हे त्यांच्या लक्षात आलं पाहिजे..पंधरा वर्षे मंत्री होते तीस वर्ष शिवसेनेमध्ये नेता म्हणून काम करत होते काय उपटले..

मला बोलायला खूप काही येतं कधीतरी रस्त्यात समोरासमोर या कशा भाषेत मला बोलता येतं त्यावेळेला कोणी वाचवायला राहणार नाही ...हे लक्षात ठेवा रवी चव्हाण आहे रवी चव्हाण रवी चव्हाण सारखं देऊ शकतो मात्र युती धर्म पाळतोय याचा अर्थ असा नाही कोणीही काही बोले आणि आम्ही ऐकून घे होणार नाही हे लक्षात ठेवा..तोंड सांभाळून बोलायचं नाही तर तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही, असे खरमरीत उत्तर चव्हाण यांनी दिले.. दरम्यान मुंबई - गोव्याच्या रस्त्यावर महायुती मधील दोन घटक पक्षात मात्र आता मिठाचा खडा पडल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT