Sharad Ponkshe statement Hindu society was non violent became impure mumbai
Sharad Ponkshe statement Hindu society was non violent became impure mumbai  sakal
मुंबई

हिंदू समाज अहिंसक होता होता नपुंसक कधी झाला कळलंच नाही - शरद पोंक्षे

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - अहिंसा परमो धर्म: यामध्ये केवळ अर्धाच श्लोक आम्हाला शिकवला गेला. अहिंसा हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे आणि या सर्वश्रेष्ठ धर्माच्या रक्षणासाठी हातात शस्त्र उचलणे हा त्याही पेक्षा मोठा धर्म आहे हे आम्हाला शिकवलं नाही. अंहिंसा सारखं दुसर शस्त्र नाही. अहिंसा परमो धर्म: चे एवढे ढोस आम्हाला पाजले की हा हिंदू समाज अहिंसक होता होता नपुसंक कधी झाला हे आम्हाला कळलचं नाही असे परखड मत सावरकर अभ्यासक शरद पोंक्षे यांनी डोंबिवलीत मांडले. आम्हाला राग येत नाही, चिड येत नाही. कारण आम्हाला शौर्याचा इतिहास शिकवला. रक्त न सांडता स्वातंत्र्य मिळालं हे आम्हाला खरं वाटते हा घोर अपमान आहे, ज्यांनी स्वातंत्र्यासाठी रक्त सांडले आहे त्यांचा असेही पोंक्षे म्हणाले.

स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था डोंबिवली शाखा यांच्यावतीने स्वातंत्र्यवीर सावरकर विचार दर्शन या व्याखानाचे आयोजन करण्यात आले होते. ब्राह्मण सभागृह येथे रविवारी पार पडलेल्या या व्याख्यानात सावरकर अभ्यासक ज्येष्ठ वक्ते शरद पोंक्षे यांनी सावरकरांविषयी आपले विचार मांडले. राष्ट्राला सर्व विचारांची गरज असते पण ती तेवढ्याच प्रमाणात. हिंदूस्थान हा हिंदूंचा आहे, यामध्ये कम्युनिझम, समाजवाद हवा तो नसून चालत नाही. पण त्यांचे प्रमाण ठरलेले आहे हे त्या राजाला कळते जो सुसंस्कृत असतो. तो कधी कोणते उपोषण होऊ देत नाही. उपोषण हा कधीच मार्ग नाही उपोषण तेव्हाच यशस्वी होते जेव्हा राजा सुसंस्कृत असतो. सुसंस्कृत राजा असणे म्हणजे काय ? एक प्रभू श्रीरामांचे रामराज्य व दुसरे छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य असे राज्य चालविणारा राजा असावा असे ते म्हणाले. हिंदी राष्ट्रवाद हा अत्यंत घात आहे, मुस्लिम लांघुलचालन हे अत्यंत घातक आहे, हे दोन मुद्दे जोपर्यंत कॉंग्रेस सोडत नाही तोपर्यंत हा सावरकर कॉंग्रसमध्ये कधीही येऊ शकत नाही. आदि विचार मांडत त्यांनी कॉंग्रेस सरकारने हिंदूत्वापासून कसे सगळ्यांंना दूर केले, परंतू आता खरे दिवस यायला लागले आहेत असे ते म्हणाले.

सावरकरांचे विचारांनी आपण पुढे जाणे गरजेचे आहे, पण सध्या आपण आपल्या देशासाठी काय करु शकतो याचा विचार प्रत्येकाने केला पाहीजे. प्रत्येकासाठी काही ना काही काम ठरवून दिले आहे, याची उदाहरण त्यांनी सांगितले. तसेच आपला देश स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिशांनी पोखरला होता. स्वातंत्र्यानंतर भ्रष्टाचाराची जी किड लागली ती एवढी तळागाळापर्यंत जाऊन पोहोचली आहे, ती तळागाळातल्या सामान्य लोकांनीच उखडून टाकायची गरज आहे. देशाला भ्रष्टाचाराची वाळवी लागली असून ती थांबवायची असेल तर सर्वसामान्यांनी पुढे येण्याची गरज आहे. 75 वर्षे अशी गेली, पुढील 75 वर्षाचे हे ध्येय्य असायला हवे की यामध्ये जो पैसा खाईल त्याला आपण उभच करता कामा नये. आणि त्याची सुवर्ण संधी आपल्या आयुष्यात येते दर ५ वर्षांनी मतदानाच्या रुपाने त्याचा उपयोग करा असा सल्ला त्यांनी उपस्थितांना दिला.

हिंदूत्व वादी सरकारवर विश्वास

हिंदूत्ववादी सरकारवर माझा पूर्ण विश्वास आहे. सरकारचा मी पाठीराखा असून यापुढे हिंदूंना ताठ मानेने जगता येईल असे काम त्यांनी करावे आणि ते करतील अशी मला खात्री आहे. आनंद दिघे यांच्या तालमीत शिंदे तयार झालेले असून ते नक्कीच चांगले काम करतील. त्यांच्याकडे फार वेळ नाही आहे, सहा महिन्यानंतर आचार संहिता लागत आहे. दिड वर्षाच्या कालखंडात विस्कटलेली घडी नीट करणे सोप्पे नाही, परंतू ते नक्की प्रयत्न करतील व त्यांचे प्रयत्न दिसून येत आहे.

मराठी चित्रपटांना थिएटर नाही हे दुर्दैव

मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. भांडायची गरजच लागली नाही पाहीजे न मागता आपोआप मिळायला हवे. महाराष्ट्रात मराठी माणसाला सर्व मिळाले पाहीजे पण ते होत नाही, कारण आमची इच्छाच नाही आहे. कर्नाटकात कानडी भाषा ही सक्तीची आहे, महाराष्ट्रात मराठी का होऊ शकत नाही असा सवाल त्यांनी केला. मराठीला प्राईम टाईम शो देण्याचे कबुल केल्यानंतरच थिएटरला परमीशन मिळते, पण तेवढे शो मिळतात का हे कोणीच पहात नाही. सगळ्यांचेच एकमेकां बरोबर लागे बंध आहेत. सर्व पक्षांच्या आज चित्रपट संघटना आहेत, मात्र त्याही काही काम करत नाही. चित्रपट महामंडळ आहे ते ही काम करत नाही. त्यांनी मराठी चित्रपटांसाठी काही तरी करायला हवे असे परखड मत पोंक्षे यांनी व्यक्त केले. केवळ शो नाही म्हणून चित्रपट निर्मात्याचे किती नुकसान होते. दोन आठवड्यांनी शो मिळून काय फायदा. मराठीत शंभरातले दोन चित्रपट चालतात त्यात ही अवस्था असेल तर कसे होणार अशी चिंता देखील त्यानी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kiran Sarnaik: आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील ४ जणांचा अपघातात मृत्यू! पातूरमध्ये भीषण अपघात

Pune Traffic Update: उद्यापासून पुणे वाहतुकीत गर्डर लॉचिंग कामामुळे मोठे बदल, कोणते असतील पर्याय मार्ग?

Kapil Sharma : 'द ग्रेट इंडियन कपिल शो'साठी कपिल शर्मा घेतो 'इतकं' मानधन !

Chitra Wagh: "चित्रा वाघ यांनी माफी मागावी अन्यथा..."; 'पॉर्नस्टार' प्रकरणावर अभिनेत्याचा गंभीर इशारा

RBI: गुंतवणूकदार मालामाल! रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत

SCROLL FOR NEXT