teachers
teachers 
मुंबई

पुन्हा ठाणे जिल्ह्यात नियुक्ती झाल्याने शिक्षकांना दिलासा

मुरलीधर दळवी

मुरबाड (ठाणे) -  गेल्या चार वर्षांपासून पालघर जिल्ह्यात कार्यरत असलेल्या 321 शिक्षकांना पुन्हा ठाणे जिल्ह्यात नियुक्ती मिळाल्याने दिलासा मिळाला आहे. तर ठाणे जिल्ह्यातून 112 शिक्षकांची पालघरमध्ये बदली झाली आहे. 

शिक्षकांच्या बदल्यांसाठी पुढाकार घेणाऱ्या जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांच्यासह जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजुषा जाधव, शिवसेनेचे भिवंडी जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांचे शिक्षकांनी आभार मानले. विशेषतः पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे बदल्या झाल्याचे शिक्षकांनी सांगितले

2014 मध्ये झालेल्या शिक्षकांच्या सार्वत्रिक बदल्यांमध्ये 550 हून अधीक शिक्षकांची पालघरमध्ये बदली झाली होती. पालघर जिल्ह्याची स्थापना झाल्यानंतर शिक्षकांना बदलीसाठी जिल्हा बदलीचा नियम लागला. त्यामुळे या शिक्षकांचा पुन्हा ठाणे जिल्ह्यात परतण्याचा मार्ग बंद झाला होता. बहूसंख्य शिक्षकांची कुटुंबे व मुले शिक्षणासाठी ठाणे जिल्ह्यात व नोकरी पालघर जिल्ह्यात अशी स्थिती निर्माण झाली होती. 

या शिक्षकांच्या पुन्हा ठाणे जिल्ह्यात बदलीसाठी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार पाठपुरावा करीत होते. जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदाची सू्त्रे स्विकारल्यानंतर शिक्षण समितीचे सभापती म्हणून त्यांनी नव्याने प्रयत्न सुरू केले होते. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मंत्रालयात बैठका घेण्यात आल्या. तसेच ठाणे व पालघर जिल्हा परिषदेतील पदाधिकारी व अधिकाऱ्यांशी संवाद साधला. अखेर या प्रयत्नांना यश आले असून, राज्य सरकारने पालघरमधून ठाण्यात 321 शिक्षकांच्या बदल्या केल्या, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी दिली.

ठाणे जिल्ह्यातून 112 शिक्षकांची पालघर जिल्ह्यात बदली झाली. मात्र, ठाणे जिल्ह्यात जागा रिक्त झाल्यानंतर साधारण दीड वर्षांत शिक्षकांना पुन्हा ठाणे जिल्ह्यात घेतले जाईल, अशी माहिती सुभाष पवार यांनी दिली.

पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजुषा जाधव, उपाध्यक्ष सुभाष पवार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांचे आभार मानण्यासाठी जिल्ह्यातील शिक्षक सोमवारी ठाण्यात आले होते. त्यावेळी एका अनौपचारिक कार्यक्रमात शिक्षकांनी पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. विकल्प समितीचे शंकर भोईर यांनी पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार, शिक्षणाधिकारी मीना यादव यांचेही शिक्षकांनी आभार मानले.

येत्या वर्षभरात ठाणे जिल्ह्यात रिक्त होणाऱ्या शिक्षकांच्या जागी पालघर जिल्ह्यातून बदलीसाठी इच्छूक असलेल्या शिक्षकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या दीड वर्षांत पालघर जिल्ह्यातील शिक्षकांना निश्चितच दिलासा मिळेल, असा विश्वास जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

IPL 2024 LSG vs RR Live Score : शतकी भागीदारी रचणारी राहुल - हुड्डाची जोडी फुटली; लखनौ 150 च्या जवळपास पोहचली

DC vs MI, IPL 2024: टीम डेविडचा कडक षटकार, मात्र संपूर्ण स्टेडियम हळहळलं; पाहा कोण जखमी झालं?

Hardik Pandya DC vs MI : सतत हसत असणाऱ्या पांड्या दिल्लीविरूद्ध मात्र जाम भडकला; Video व्हायरल

SCROLL FOR NEXT