मुंबई

समाजातील विषमता दूर झाल्यासच प्रगती - डॉ. काकोडकर

सकाळवृत्तसेवा

ठाणे - आयुष्यात केवळ पैसे कमावणे हे जीवनाचे ध्येय असू शकत नाही. स्वत:चा उत्कर्ष साधतानाच समाजाचेही ऋण फेडता आले पाहिजेत. समाजातील विषमता दूर झाली, तरच देश खऱ्या अर्थाने पुढे जाईल. तीच खरी शाश्वत प्रगती ठरेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी केले.

ठाण्यात सेवा सहयोग फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या विद्यार्थी, पालक आणि देणगीदारांच्या मेळाव्यात काकोडकर बोलत होते. काकोडकर म्हणाले, 'आर्थिक कमतरतेमुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्वरूपात मदत करण्याच्या हेतूने सात वर्षांपूर्वी ठाण्यात सुरू झालेली ही चळवळ आता राज्यभर फोफावते आहे. यंदा 25 जिल्ह्यातील 109 विद्यार्थ्यांना तब्बल एक कोटी एक लाख रुपयांची मदत देण्यात आली.''

रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेनिमित्त शनिवारी ठाण्यात आलेल्या नागालॅंडचे राज्यपाल डॉ. पद्मनाभ आचार्य यांनीही संमेलनाला हजेरी लावून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. दरम्यान, सेवा सहयोग फाउंडेशनच्या योजनेतून शिक्षण पूर्ण करून नोकरीवर लागलेल्या चार विद्यार्थ्यांनी आपले पहिले वेतन संस्थेला दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: 'डायल 108' अ‍ॅम्ब्युलन्स प्रोजेक्ट कंत्राट प्रकरण तापणार? हायकोर्टाकडून राज्य सरकारला नोटीस

Pat Cummins: कमिन्सनं सांगितलं कसं तुटलेलं त्याचं बोट... ऐकून हार्दिक अन् सूर्याही झाले शॉक; Video व्हायरल

Latest Marathi News Live Update : 'भाजप उमेदवार म्हणतायत संविधान बदलू, मात्र मोदी..'; काय म्हणाल्या प्रियांका गांधी?

Wedding Season : नोंदणी पद्धतीने विवाह करायचा आहे? मग, जाणून घ्या सोपी प्रक्रिया

18 आमदारांची प्रतिष्ठा लागली पणाला; नेत्यांच्या कामगिरीवरच लोकसभेच्या उमेदवारांचं भवितव्य अवलंबून!

SCROLL FOR NEXT