मुंबई

महिलांपेक्षा पुरुषांना आकडीचा त्रास अधिक

शर्मिला वाळुंज

ठाणे - आकडी येणे, फीट येणे, मिरगी यांसारख्या आजारांमध्ये महिलांपेक्षा पुरुषांचेच प्रमाण अधिक असल्याची माहिती ‘राष्ट्रीय एपिलेप्सी डे’निमित्त समोर आली आहे. १७ नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय एपिलेप्सी (अपस्मार दिन) म्हणून साजरा केला जात असून ठाणे जिल्ह्यात दहा महिन्यांत ६७२ रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी पुरुषांची संख्या ४७४ आहे. त्या तुलनेत महिलांची संख्या १९८ एवढी आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

रस्त्याने चालताना अचानक एखाद्याला चक्कर येऊन माणूस खाली पडतो. त्याचे शरीर वाकडेतिकडे झाल्यास नागरिक त्याला लगेच चप्पलचा, कांद्याचा वास देतात. आकडी आली, फीट आली, असे सारेच बोलतात; परंतु हा एकच आजाराचा भाग असून अपस्मार म्हणून हा आजार ओळखला जातो. पुरुषांमध्ये या आजाराचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत असून मेंदूतील विद्युतप्रवाहात अचानक बिघाड झाल्याने आकडी, फीट, मिरगी येणे हे प्रकार घडतात. काही तीव्र संवेदना, प्रकाशझोत डोळ्यावर पडणे, वाचनाची सुरुवात वेगाने करणे, वेगाने श्‍वसन करणे, कधीकधी अगदी गरम पाणी डोक्‍यावर घेणे, स्त्रियांना मासिक पाळी येण्याच्या वेळी झटका येतो आदींमुळे आकडी, फीट येण्याचे प्रकार घडतात. यामागे अनुवांशिकता असते. जन्माच्या वेळी डोक्‍याला इजा झालेल्या बालकांना फीट येण्याचे प्रकार घडतात.

महिलांपेक्षा पुरुषांमध्ये या आजाराचे प्रमाण दुप्पट असल्याचे दिसून येते. या आजाराने ग्रस्त रुग्णांना योग्य ते औषधोपचार; त्यासोबत मानसिक आधाराचीही गरज असते. ठाणे जिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांना मानसोपचारतज्ज्ञ डॉ. खुशबु चौधरी, कीर्ती राजपूत, श्रीरंग सिद यांच्या मार्गदर्शनाखाली औषधोपचार व मानसिक समुपदेशन केले जाते. रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांवर ते पूर्णपणे बरे होईपर्यंत औषधोपचार होतात. राष्ट्रीय ॲपीलप्सी दिनानिमित्त ठाणे जिल्हा रुग्णालयातर्फे या आजाराची माहिती देणारे मार्गदर्शन शिबिर घेतल्याची माहिती श्रीरंग सिद यांनी दिली.

आकडी आल्यावर हे करा
एखाद्याला आकडी आल्यास त्याला कांदा किंवा चप्पलचा वास न देता मोकळा वारा येऊ द्या. तो शुद्धीवर येण्यासाठी प्रयत्न करा. रुग्णाला झटका आल्यास जीभ दातात चावली जाण्याची शक्‍यता असते. या वेळी दातांमध्ये पट्टी किंवा कपडा सरकवण्याचा प्रयत्न करू नये, त्यामुळे इजा होऊ शकते. झटके थांबवण्यासाठी रुग्णाला दाबून धरू नये. रुग्णाला एका कुशीवर झोपवावे, लाळ गळू द्यावी, नंतर रुग्णाला धीर द्यावा, असा सल्ला डॉक्‍टरांनी दिला.

अपस्मार हा मेंदूशी निगडित आजार आहे. महिलांपेक्षा पुरुषांमध्ये या आजाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. ठाणे जिल्हा रुग्णालयात या आजारावर योग्य ते औषधोपचार केले जात आहेत. या आजारात नेमकी काय काळजी घ्यावी, याविषयी जनजागृतीपर कार्यक्रमही रुग्णालयातर्फे घेतले जातात.  
- डॉ. संगीता माकोडे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक,  ठाणे सिव्हिल हॉस्पिटल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

Yoga Tips : उत्तम पचनक्षमतेसाठी योगा फायदेशीर, जेवण झाल्यावर करा ‘या’ योगासनांचा सराव

Samantha Ruth Prabhu: एकवेळेच्या जेवणाचीही होती भ्रांत अन् आज आहे कोट्यवधींची मालकीण; 'ऊ अंटावा' गर्ल समंथाचा सुपरस्टार होण्याचा प्रवास

SCROLL FOR NEXT