मुंबई

पालघर जिल्हा प्रगतिशिल जिल्हा म्हणून ओळख निर्माण करणार

CD
पालघरला प्रगतिपथावर आणू पालकमंत्री दादा भुसे यांचा विश्वास पालघर, २७ (बातमीदार) ः जिल्हा नियोजन समितीमार्फत जिल्ह्यात विविध ठिकाणी विकासकामे सुरू आहेत. भविष्यात पालघर जिल्हा हा प्रगतिशिल जिल्हा म्हणून ओळख निर्माण करणार, असा विश्वास कृषी माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केले. बुधवारी ७२ वा प्रजासत्ताकदिन सोहळा पोलिस परेड ग्राऊंडवर, पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाला, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्षा वैदेही वाढाण, खासदार राजेंद्र गावित, आमदार श्रीनिवास वनगा, नगराध्यक्षा डॉ. उज्ज्वला काळे, जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे, निवासी जिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन, सर्व विभागातील अधिकारी वर्ग, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. भुसे म्हणाले, पालघर जिल्ह्यात जी विकास कामे सुरू आहेत, ती पाहता लवकरच आपला जिल्हा राज्यात प्रगतशील जिल्हा म्हणून ओळख निर्माण करेल यात शंका नाही. शासन आणि जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न तसेच जनसहभाग यामुळेच हे साध्य होणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी मिळून एकत्रितपणे जिल्ह्याच्या विकासाला प्राधान्य देऊ. एकलव्य निवासी शाळेसाठी १० एकर जागा भुसे यांनी सांगितले, की पालघर जिल्ह्याच्या मुख्यालयाचे काम सिडकोमार्फत करण्यात येऊन जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद व पोलिस अधीक्षक कार्यालय सुरू करण्यात आले आहे. तसेच महिला रुग्णालयाकरिता पाच एकर, बिरसा मुंडा आदिवासी विकास भवनकरिता पाच एकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनकरिता पाच एकर, शासकीय बालगृहाकरिता पाच एकर जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे व मोखाडा येथे नवीन एकलव्य निवासी शाळेकरिता आदिवासी विकास विभागास १० एकर जागा देण्यात आली आहे. ऑक्सिजन साठ्यात जिल्हा परिपूर्ण कोविड विषाणूचा मुकाबला करण्यासाठी पालघर ग्रामीण जिल्ह्यात सात पी.एस.ए. प्लॅटच्या माध्यमातून ५.६७ मेट्रिक टन ऑक्सिजननिर्मिती करण्यात येत आहे. तसेच सहा एलएमओ प्लँट कार्यान्वित करून ६० मेट्रिक टन ऑक्सिजन साठवण्याची क्षमता निर्माण करण्यात आली आहे. पालघर जिल्हा ऑक्सिजन उपलब्धतेमध्ये स्वयंपूर्ण जिल्हा झालेला आहे. पर्यटनाला चालना पालघर जिल्ह्यातील पर्यटनविषयक विकास करण्याकरिता जिल्ह्यातील सागरी किनाऱ्यांचा विकास करणे, मिनी महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध असलेले जव्हार शहर व परिसरातील पर्यटन स्थळांचा व जिल्ह्यातील इतर पर्यटन स्थळांचा विकास करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. माध्यान्ह भोजन योजनेंतर्गत १५५९ बांधकाम कामगार; तर विक्रमगड व जव्हार तालुक्यातील २४६५ मनरेगा कामगारांना माध्यान्ह भोजन देण्यात येत असल्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Andre Russell Retirement: वेस्ट इंडिजचा 'ऑलराउंडर' आंद्रे रसेलने केली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर!

Delhi to Goa flight emergency Landing: मोठी बातमी! दिल्ली ते गोवा विमानाचं मुंबईत इमर्जन्सी लँडिंग

High Court Bench : पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करण्याची आमदार कुल यांची अधिवेशनात मागणी

Nimisha Priya: तूर्तास फाशी टळली, आता पुढे काय? जाणून घ्या नेमकं काय आहे येमेनमधील निमिषा प्रिया प्रकरण

Israel attacks Syria: इस्राईलकडून सीरियाच्या मंत्रालयावर हल्ला! लष्कराचे मुख्यालयही टार्गेट; हल्ल्याचं कारण केलं स्पष्ट

SCROLL FOR NEXT