मुंबई

राहुल गांधी यांना १६ मार्चपर्यंत दिलासा

CD

मुंबई, ता. २३ : राफेल विमान खरेदी प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील टीकेमुळे दाखल झालेल्या मानहानीच्या खटल्यात मुंबई उच्च न्यायालयाने आज कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना दिलासा दिला. गांधी यांच्यावर १६ मार्चपर्यंत कोणतीही कारवाई करू नये, असे निर्देश न्यायालयाने गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयाला दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी २०१८ मध्ये जयपूरच्या जाहीर सभेत वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याविरोधात भाजप कार्यकर्ते महेश श्रीश्रीमल यांनी गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयात गांधी यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता. या दाव्याची दखल गिरगाव न्यायालयाने घेतली असून गांधी यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. ही कारवाई रद्द करण्यासाठी आणि संबंधित खटला रद्दबातल करण्यासाठी गांधी यांनी उच्च न्यायालयात ॲड. कुशल मोर यांच्यामार्फत याचिका केली होती. याचिकेवर गुरुवारी (ता. २३) न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने यापूर्वी दिलेला दिलासा १६ मार्चपर्यंत कायम ठेवला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT