मुंबई

पदवीनंतर आता थेट पीएचडीला प्रवेश मिळणार

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर पदवीचा अभ्यासक्रम चार वर्षांचा करण्यासाठी अभ्यासक्रम आराखडा जाहीर झाला आहे. मंगळवारी (ता. १६) उच्च तंत्रशिक्षण विभागाने पदव्युत्तरच्या सर्व अभ्यासक्रमांचा एक वर्षाच्या अभ्यासक्रमासह दोन वर्षांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रसाठी अभ्यासक्रम व श्रेयांक आराखडा जाहीर केला. यासाठी सुधारित मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांनुसार चार वर्षे पदवी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना सर्व सेमिस्टरमध्ये श्रेयांक हे कम्युलेटिव्ह ग्रेड पॉइंट ॲव्हरेज (सीजीपीए)हून अधिक घेतल्यास त्याला थेट पदव्युत्तर अभ्यासक्रमाऐवजी पीएचडीसाठी प्रवेश घेता येईल.
विद्यार्थीवर्गाला चार वर्षे पदवी पूर्ण केल्यानंतर एक वर्षांचा पदवी अभ्यासक्रम, तर तीन वर्षे पदवी पूर्ण केलेल्यांना दोन वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम करता येणार आहे. यासाठी शिक्षण विभागाने त्यासाठीचा आराखडा आणि सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार राज्यातील सर्व विद्यापीठांनी पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षाच्या अभ्यासक्रमांचा आराखडा तयार करणे बंधनकारक झाले असून त्याची अंमलबजावणी जूनपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षात करावी लागणार आहे. तसेच त्यासाठीचे वेळापत्रकही जाहीर करावे लागणार आहे.
मुंबई विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांच्या अध्यक्षखालील उपसमितीने सादर केलेल्या अहवालानंतर स्थापन करण्यात आलेल्या सुकाणू समितीने पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम आराखड्यासंदर्भात आपला अहवाल सादर केला होता. त्यानंतर अभ्यासक्रम व श्रेयांक आराखड्याची एकसमान प्रमाणात अंमलबजावणी होण्यासाठी २० एप्रिल रोजी सुधारित सूचना जारी करण्यात आल्या होत्या. आता त्यात काही बदल करून पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी अभ्यासक्रम व श्रेयांक आराखडा आणि त्यासाठीच्या सुधारित मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
--
असे होणार पदव्युत्तरमधील बदल
- प्रत्येक सेमिस्टरमध्ये किमान २० आणि कमाल २२ श्रेयांक असतील.
- विद्यापीठे सेमिस्टरनुसार श्रेयांक देण्यासाठी यंत्रणा विकसित करू शकतील.
- एक आणि दोन वर्षांच्या पदव्युत्तरमध्ये विद्यार्थ्यांना ऑन द जॉब, सोबत प्रशिक्षण तसेच इंटर्नशिपसाठी चार क्रेडिट असतील.
- पहिल्या वर्षात चार श्रेयांक रिसर्च मेथडॉलॉजी घटक तर तिसऱ्या समिस्टरमध्ये संशोधन प्रकल्प अनिवार्य असेल.
- पदव्युत्तरच्या एका वर्षानंतर बाहरे पडल्यास पीजी डिप्लोमा म्हणून पदवीची नोंद होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; सूत्रांची माहिती

Morning Breakfast: सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा पनीर रोस्टी, नोट करा रेसिपी

World Press Freedom Day 2024 : जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास

Sakal Podcast : जळगावात कोणाचं पारडं जड? ते इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापुरात दाखल, मतदारसंघातील प्रचाराचा घेणार आढावा

SCROLL FOR NEXT