मुंबई, ता. ३ : राज्यातील निरक्षरांचे सर्वेक्षण सुरू असून त्यासाठी शिक्षकांचा सक्रिय सहभाग आहे. राज्यातील प्रत्येक निरक्षरांना साक्षर करण्यासाठी मागील दोन आठवड्यांपासून नवभारत सारक्षता अभियानाच्या माध्यमातून सर्वेक्षण सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारपासून (ता. १) राज्यात साक्षरता सप्ताहाला सुरुवात झाली आहे. यात शिक्षकांसोबतच स्वयंसेवक, सामाजिक संस्था आणि शिक्षणाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्यांनी सहभागी होण्याचे आवाहन शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने केले आहे.
राज्यात साक्षरता सप्ताहादरम्यान ‘उल्लास नवभारत’ साक्षरता कार्यक्रमाचा लोगो, घोषवाक्ये समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहचवावेत. विद्यार्थी, शिक्षक व स्वयंसेवक यांना योजनेत स्वयंस्फूर्तीने भाग घेण्यासाठी नवभारत साक्षरता कार्यक्रम मोबाईल ॲपवर स्व-नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच या ‘साक्षरता सप्ताह’ कालावधीमध्ये जिल्हा साक्षरता अभियान प्राधिकरण व विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने वॉर्ड, गाव आणि शाळा, महाविद्यालय स्तरावर विविध प्रकारचे उपक्रम राबवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
--
सर्वेक्षणात शिक्षकांचा सहभाग महत्त्वाचा
नवभारत साक्षरता कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळा, शिक्षकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या अध्यापनाच्या कार्याच्या वेळेव्यतिरिक्त आपल्या परिसरात जाऊन या सर्व्हेक्षणाचे काम करण्याच्या सूचना यापूर्वीच विभागाकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे शिक्षकांनी या सर्व्हेक्षणात आपला सहभाग नोंदवून त्यासाठीची माहिती भरण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.