मुंबई

बेस्ट बसने चिरडल्याने मायलेकाचा मृत्यू

CD

बेस्ट बसने चिरडल्याने मायलेकाचा मृत्यू
वडाळा चर्चजवळील घटना

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : मुंबईत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात जनजीवन विस्कळित झालेले असतानाच सोमवारी (ता. १८) दुपारी वडाळा चर्चजवळ बेस्ट बसचा भीषण अपघात घडला. मुसळधार पावसामुळे शाळा सुटल्याने घरी परतणाऱ्या आई-मुलाला बेस्टच्या बसने चिरडले. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला.
बेस्टच्या आणिक आगारातून चालणारी एसएमटीएटीपीएल (डागा ग्रुप वेटलीज)ची ए-१७४ क्रमांकाची बस दुपारी ३.१० वाजता वीर कोतवाल उद्यानाहून भरणी नाक्याकडे जात असताना हा अपघात झाला. बसचालक बापूराव शिवाजी नागवणे (वय ४१) यांनी रस्ता ओलांडणाऱ्या लिओबा सेल्वराज (वय ३८) आणि तिचा मुलगा अँथनी सेल्वराज (वय ८) यांना धडक दिली. दोघेही पुढच्या डाव्या चाकाखाली आल्याने गंभीर जखमी झाले. पोलिसांनी तातडीने मुलाला केईएम रुग्णालयात व आईला सायन रुग्णालयात नेले; मात्र दोघांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनेची नोंद माटुंगा पोलिसांनी केली असून, चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, गेल्या दोन वर्षांत कंत्राटी बसचालकांच्या बेफिकिरीमुळे १५हून अधिक नागरिकांचा बळी गेला आहे. ९ डिसेंबर २०२४ रोजी कुर्ला पश्चिमेत घडलेल्या भीषण अपघातात तब्बल १५ जणांना बसने चिरडले होते, त्यात नऊ जणांचा मृत्यू झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT