सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३ : राज्यात महापुरुषांचा आणि संतांचा अपमान झाल्याबद्दल संबंधितांनी माफी मागितली पाहिजे, अशी भूमिका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनात घेतली होती. त्यातच अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याने छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांनी दिलेल्या बलिदानाचाही अपमान झाला आहे. त्यामुळे त्यांनीही माफी मागितली पाहिजे, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यानंतर भाजप आक्रमक झाली आहे. यावरून भाजप आणि राष्ट्रवादीत वाद रंगला आहे. याचदरम्यान प्रसारमाध्यमांनी मुख्यमंत्री शिंदे हे सोमवारी रात्री ठाण्यात आल्यावर या वक्तव्याबाबत त्यांना छेडले असता मुख्यमंत्र्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. धर्मवीर संभाजी महाराज यांच्याबद्दल ते धर्मवीर नाहीत असे वक्तव्य अजित पवार यांनी केले. त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांनी धर्म सोडावा यासाठी त्यांचे हाल केले. त्याचे शब्दांमध्ये वर्णन होऊ शकत नाही असेही ते म्हणाले.
संभाजी महाराजांना धर्मवीर ही पदवी तुम्ही-आम्ही दिलेली नाही. त्यांनी धर्मासाठी आणि स्वराज्यासाठी बलिदान दिले म्हणून त्यांना धर्मवीर ही पदवी लागली आहे. असे म्हणत इतिहास कसा पुसू शकता, असाही सवालही मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांना केला. अधिवेशनात आपण घेतलेल्या भूमिकेप्रमाणे संभाजी महाराज आणि त्यांच्या बलिदानाबद्दल माफी माघावी, न्याय सर्वांना सारखा असला पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.